शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

मुख्य रस्त्यावरच वाहने उभी हिंगोली : येथील नांदेडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. येथून मोठ्या ...

मुख्य रस्त्यावरच वाहने उभी

हिंगोली : येथील नांदेडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. येथून मोठ्या प्रमाणावर वाहने धावत असताना मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करण्याची स्पर्धा लागत आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

किलोमीटर नोंदीचे दगड गायब

हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेले अनेक ठिकाणचे किलोमीटर नोंदीचे दगड निघत आहेत. यामुळे परराज्यातील वाहनचालकांना प्रवास अंतराचा अंदाज लागत नसल्याचे चित्र आहे. मोठ्या शहराचे अंतर किती किलोमीटरवर आहे, याचा अंदाज लागत नसल्याने चालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ओढ्यांतील वाळू उपसा वाढला

कळमनुरी : तालुक्यात ओढ्यांची संख्या मोठी आहे. सध्या नदी घाटावरील वाळू उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे वाळूमाफिया ओढ्यांतील वाळू उपसा करण्याकडे वळले आहेत. ओढ्यांतील वाळू उपशाकडे महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वाळूमाफियांचे फावत आहे. याकडे लक्ष देऊन या वाळू उपशावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.

जनता बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय

हिंगोली : येथून नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच या मार्गावरील गावांतूनही प्रवासी मोठ्या शहरात जातात. मात्र, खेडेगावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी साधी बस, जनता बस सुरू नाही, परिणामी जलद बसने प्रवास करावा लागत आहे. यासाठी कळमनुरी अथवा आखाडा बाळापूर, वारंगा येथे यावे लागत आहे. या मार्गावर जनता बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

वृक्षलागवड करण्याची गरज

हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वृक्ष लागवडीनंतर यातील बहुतांश रोपटे वाळून जात आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीचा हेतू साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वृक्षतोडही होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे. यासाठी वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करत वृक्षलागवड करावी, तसेच रोपटे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

ओढे, नाले आटले

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील ओढे, नाले आटले असून पाणीपातळी खालावत आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यातून वन्यप्राण्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यासाठी माळरानावर पाणवठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

बालकांनी जोपासले विविध छंद

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता पाचवी ते आठवी, तसेच नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले असले तरी पहिली ते चौथीचे वर्ग व अंगणवाड्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे बालकांना अद्याप घरीच राहावे लागत आहे. दिवसभर खेळून कंटाळत असल्याने लहान बालके पोहणे, चित्रकला, सायकल चालविणे आदी छंद जोपासत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.