शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

मुख्य रस्त्यावरच वाहने उभी हिंगोली : येथील नांदेडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. येथून मोठ्या ...

मुख्य रस्त्यावरच वाहने उभी

हिंगोली : येथील नांदेडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. येथून मोठ्या प्रमाणावर वाहने धावत असताना मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करण्याची स्पर्धा लागत आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

किलोमीटर नोंदीचे दगड गायब

हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेले अनेक ठिकाणचे किलोमीटर नोंदीचे दगड निघत आहेत. यामुळे परराज्यातील वाहनचालकांना प्रवास अंतराचा अंदाज लागत नसल्याचे चित्र आहे. मोठ्या शहराचे अंतर किती किलोमीटरवर आहे, याचा अंदाज लागत नसल्याने चालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ओढ्यांतील वाळू उपसा वाढला

कळमनुरी : तालुक्यात ओढ्यांची संख्या मोठी आहे. सध्या नदी घाटावरील वाळू उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे वाळूमाफिया ओढ्यांतील वाळू उपसा करण्याकडे वळले आहेत. ओढ्यांतील वाळू उपशाकडे महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वाळूमाफियांचे फावत आहे. याकडे लक्ष देऊन या वाळू उपशावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.

जनता बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय

हिंगोली : येथून नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच या मार्गावरील गावांतूनही प्रवासी मोठ्या शहरात जातात. मात्र, खेडेगावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी साधी बस, जनता बस सुरू नाही, परिणामी जलद बसने प्रवास करावा लागत आहे. यासाठी कळमनुरी अथवा आखाडा बाळापूर, वारंगा येथे यावे लागत आहे. या मार्गावर जनता बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

वृक्षलागवड करण्याची गरज

हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वृक्ष लागवडीनंतर यातील बहुतांश रोपटे वाळून जात आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीचा हेतू साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वृक्षतोडही होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे. यासाठी वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करत वृक्षलागवड करावी, तसेच रोपटे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

ओढे, नाले आटले

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील ओढे, नाले आटले असून पाणीपातळी खालावत आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यातून वन्यप्राण्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यासाठी माळरानावर पाणवठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

बालकांनी जोपासले विविध छंद

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता पाचवी ते आठवी, तसेच नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले असले तरी पहिली ते चौथीचे वर्ग व अंगणवाड्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे बालकांना अद्याप घरीच राहावे लागत आहे. दिवसभर खेळून कंटाळत असल्याने लहान बालके पोहणे, चित्रकला, सायकल चालविणे आदी छंद जोपासत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.