शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध महाराष्ट्रच्या ११६ विहिरी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:33 IST

मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.हिंगोली जिल्ह्याला दहा हजार सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. यापैकी ९९७0 लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडले. ४0२२ जणांना प्रशासकीय मंजुरी दिली. तर २३९३ कामे चालू आहेत. यापैकी ११६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात औंढा २0, हिंगोली-१५, कळमनुरी १३, सेनगावातील ६८ कामांचा समावेश आहे. वसमतमध्ये यातील एकही काम नाही. मग्रारोहयोत कामे करण्यास जशी पंचायत समित्यांची उदासीनता आहे, तशीच कामांचे नियमित अहवाल सादर करण्यासही उदासीनताच असल्याचे चित्र आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना दिल्यानंतरही काहीच फरक पडत नाही. या योजनेतील कामे पूर्ण होत नसल्याची बोंब लोकप्रतिनिधी वारंवार करीत आहेत. मात्र तरीही याकडे लक्ष द्यायला पंचायत समित्यांना वेळ नसल्याचे दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कामे सुरू असताना पहिल्यांदा ११६ सिंचन विहिरी पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. तर शेततळ्यांचे ५६00 एवढे उद्दिष्ट असून ग्रामसभेत अवघे ५३२ लाभार्थी निवडले. त्यापैकी ३२२ कामांना प्रशासकीय मान्यता दिली मात्र एकही सुरू झाले नाही.भू-संजिवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या कामांचे २२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात ६८७ लाभार्थी ग्रामसभेतून निवडले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. ३ सुरू तर उर्वरित ठप्प आहेत. नाडेप कंपोस्टिंगमध्येही तेवढेच उद्दिष्ट असून मंजूर ७६८ पैकी १५ सुरू व २ पूर्ण झाली आहेत.हिंगोली : मान्यतेनंतरही कामे सुरू होईनातनिर्मल शौचालयाचे २२६ प्रस्ताव मंजूर असून १२0 कामे सुरू आहेत. केवळ ८ पूर्ण झाले आहेत. शोषखड्ड्यांच्या ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरीही ४८७ कामे सुरू झाली होती. यापैकी ५0 पूर्ण झाली आहेत. अंकुर रोपवाहिकेच्या ६१ कामांना मंजुरी दिली होती. यापैकी ५६ कामे सुरू असून४ कामे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गाव तलावाचे तर एकही काम प्रस्तावित नाही. नंदनवन वृक्षलागवडीच्या योजनेत २३ कामांना मंजुरी दिली होती. १८ सुरू असून उर्वरित कामे अद्याप ठप्पच आहेत. असेच चित्र सगळीकडे दिसत आहे.याच योजनेत समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट आहे. २८८ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यापैकी १९ सुरू असून ९0 कामे पूर्ण झाली आहेत. तर १७९ कामे ठप्प आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार