शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

समृद्ध महाराष्ट्रच्या ११६ विहिरी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:33 IST

मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.हिंगोली जिल्ह्याला दहा हजार सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. यापैकी ९९७0 लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडले. ४0२२ जणांना प्रशासकीय मंजुरी दिली. तर २३९३ कामे चालू आहेत. यापैकी ११६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात औंढा २0, हिंगोली-१५, कळमनुरी १३, सेनगावातील ६८ कामांचा समावेश आहे. वसमतमध्ये यातील एकही काम नाही. मग्रारोहयोत कामे करण्यास जशी पंचायत समित्यांची उदासीनता आहे, तशीच कामांचे नियमित अहवाल सादर करण्यासही उदासीनताच असल्याचे चित्र आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना दिल्यानंतरही काहीच फरक पडत नाही. या योजनेतील कामे पूर्ण होत नसल्याची बोंब लोकप्रतिनिधी वारंवार करीत आहेत. मात्र तरीही याकडे लक्ष द्यायला पंचायत समित्यांना वेळ नसल्याचे दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कामे सुरू असताना पहिल्यांदा ११६ सिंचन विहिरी पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. तर शेततळ्यांचे ५६00 एवढे उद्दिष्ट असून ग्रामसभेत अवघे ५३२ लाभार्थी निवडले. त्यापैकी ३२२ कामांना प्रशासकीय मान्यता दिली मात्र एकही सुरू झाले नाही.भू-संजिवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या कामांचे २२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात ६८७ लाभार्थी ग्रामसभेतून निवडले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. ३ सुरू तर उर्वरित ठप्प आहेत. नाडेप कंपोस्टिंगमध्येही तेवढेच उद्दिष्ट असून मंजूर ७६८ पैकी १५ सुरू व २ पूर्ण झाली आहेत.हिंगोली : मान्यतेनंतरही कामे सुरू होईनातनिर्मल शौचालयाचे २२६ प्रस्ताव मंजूर असून १२0 कामे सुरू आहेत. केवळ ८ पूर्ण झाले आहेत. शोषखड्ड्यांच्या ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरीही ४८७ कामे सुरू झाली होती. यापैकी ५0 पूर्ण झाली आहेत. अंकुर रोपवाहिकेच्या ६१ कामांना मंजुरी दिली होती. यापैकी ५६ कामे सुरू असून४ कामे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गाव तलावाचे तर एकही काम प्रस्तावित नाही. नंदनवन वृक्षलागवडीच्या योजनेत २३ कामांना मंजुरी दिली होती. १८ सुरू असून उर्वरित कामे अद्याप ठप्पच आहेत. असेच चित्र सगळीकडे दिसत आहे.याच योजनेत समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट आहे. २८८ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यापैकी १९ सुरू असून ९0 कामे पूर्ण झाली आहेत. तर १७९ कामे ठप्प आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार