शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विकासासाठी समाजाने एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:05 IST

मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला होता.

हिंगोली : मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला होता.साठे पुढे म्हणाले की, मातंग समाजाच्या विकासासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण होणे काळाजी गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समाजाकडून आरक्षण वर्गीकरणाची मागणी होत आहे; परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आरक्षणाशिवाय समाजाचा विकास होवू शकत नाही. आज प्रत्येक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे. मातंग समाजाने आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले.संभाजीराव मंडगीकर म्हणाले की, समाज विकासाकडे वाटचाल करत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहा. माजी नगराध्यक्ष बबन शिखरे यांनी मेळाव्यात मातंग समाजाच्या विकासासाठी अनेक ठराव वाचून दाखविले. अनु.जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचे अ, ब, क,ड वर्गवारी झाले पाहिजे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास १ हजार कोटींची तरतूद करावी असे ११ ठराव त्यांनी वाचून दाखविले. महामेळाव्यात अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, हुतात्मा पोचीराम कांबळे यांच्या पत्नी धोंडाबाई कांबळे यांचा सत्कार झाला. समितीचे अध्यक्ष भागवत डोंगरे, प्रदीप खंदारे, मीराताई गायकवाड, गणेश भगत, अनिल सरोदे, चंद्रकांत कांबळे, राधाकृष्ण साठे, डॉ.संजय लोखंडे, सुनीलभाऊ सौदागर, संजयभाऊ इंचे, संजूबाबा गायकवाड, विनोद वैरागड, शिवराज जाधव, विश्वनाथ गवारे, चंद्रकांत कारके, गजानन खंदारे, प्रल्हाद दगड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. नगरसेवक रविकिरण वाघमारे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहिले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक