शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिलासादायक ! २२ नळयोजनांच्या निविदेला हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:29 IST

हिंगोली जिल्हा परिषदेच्या जवळपास १८० गावांच्या नळयोजनांच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे.

ठळक मुद्देशासन निर्णयाचा अडसर नाही

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध कामे करण्यास मनाई केली असल्याने यामध्ये पाणीपुरवठा योजनांचीही कामे अडकली होती. मात्र शासनाचा हा निर्णय या योजनांसाठी लागू आहे किंवा नाही, याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यास हिरवा झेंडा दाखविल्याने दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या जवळपास १८० गावांच्या नळयोजनांच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. मात्र या गावांचे सर्व्हेक्षण करून त्या गावाची लोकसंख्या, पुढील २५ वर्षांतील या गावाची दरडाेई ४० लिटरप्रमाणे पाण्याची गरज आदी बाबींचा विचार करून त्या योग्य जलस्त्रोत निर्माण करून या योजना राबवायच्या होत्या. मात्र ही कामे करण्यासाठी या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळत नसल्याने अडचणींचा डोंगर समोर उभा राहात आहे. तरीही तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी जवळपास तीस ते चाळीस गावांचे सर्व्हेक्षण करून त्या ठिकाणची अंदाजपत्रके तयार केली होती.

त्यानंतर जवळपास २२ गावांतील योजनांची कामे अंदाजपत्रके सादर झाल्याने शासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्याने त्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी सज्ज होती. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदी जाहीर झाली होती. तर ४ मे रोजी शसनाने सर्व विभागांना पत्र देवून नवीन कामे हाती घेवू नये, असे म्हटले होते. त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर काही कामांची निविदाही काढण्यात आली होती. त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या कामांचे आता करायचे काय? निविदा उघडायच्या की नाही, यावरून पाणीपुरवठा विभागही द्विधा मन:स्थितीत होता. तर काहींची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ही कामे ठप्प करण्याची वेळ आली होती. त्यामुळे या कामांबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. कक्ष अधिकारी रवींद्र भराटे यांनी या योजनांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली असल्याने ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्यावेत, असे सांगितले. तसेच सुधारित कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्यास सांगितले आहे.

या आहेत त्या २२ योजनाहिंगोली जिल्ह्यात मंजूर झालेल्या २२ योजनांमध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा १.१७ कोटी, दौडगाव ५१.५८ लाख, जामगव्हाण ४४.३० लाख, लक्ष्मणनाईक तांडा १८.२६ लाख, रुपूर कॅम्प १३.८८ लाख, संघानाईक तांडा २.४५ कोटी, संतूक पिंपरी ६७.५२ लाख, सेंदूरसना ६९.६२ लाख, उखळी ७३.७९ लाख, वसमत तालुक्यातील दारेफळ ६७.६० लाख, धामणगाव ७६.४० लाख, नहाद ६८.७४ लाख, पांगरा सती ४६.३७ लाख, रिधोरा ५९.५३ लाख, सेनगाव तालुक्यातील हाताळा ७६.२८ लाख, हिवरा बेल २४.६८ लाख, माहेरखेडा ५२.११ लाख, शेगाव खोडके ७०.१० लाख, उटी ब्रह्मचारी ८१.०५ लाख, कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा ३८.१० लाख, रुद्रवाडी ६२.८३ लाख या योजनांचा समावेश आहे.

सर्व कामांना हिरवा झेंडा या मंजूर असलेल्या कामांपैकी काही कामे तांत्रिक लिफाफे उघडण्याच्या प्रक्रियेत होती. तर काही कामे आर्थिक लिफाफे उघडण्याच्या प्रक्रियेत होती. याशिवाय काही कामे ही कार्यारंभ आदेश देण्याच्या प्रक्रियेत होती. तर काही कामांची नेमकीच निविदा प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र आता या सर्व कामांना हिरवा झेंडा मिळाला आहे.

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोली