शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

आओ जाओ घर तुम्हारा ! दुपारी तीन वाजेनंतर तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने ...

कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न

हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले असतानाही तपासणी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच होताना दिसून येत आहे. त्यानंतर बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे प्रवासी बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना कसा रोखणार? हा प्रश्न पडला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ ते ७ मार्च दरम्यान सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. या दरम्यान, जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील बसेस बाहेरगावी सोडण्याचे बंद केले होते. असे असताना पर जिल्ह्यातील बसेस मात्र आगारात येऊन जात होत्या. जिल्हा प्रशासनाने १ मार्चपासून बसमधून आलेल्या प्रवाशांची तसेच जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, ही वेळ तीन वाजेपर्यंतची देण्यात आली आहे. त्यामुळे तीन नंतर मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे पहायला मिळत आहे.

बॉक्स

लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणी नाही

पुणे, सोलापूर, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या बसेस तिन्ही आगारातून सोडण्यात येत आहेत. परंतु, आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची काही तपासणी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे बहुतांश प्रवासी हे विनामास्कच बसेसमध्ये चढत असल्याचे पहायला मिळत आहे.

इतर राज्यातील बसेस सुरू; पण तपासणी होईना

हिंगोली ते हैदराबाद आणि वसमत ते हैदराबाद ही बस १ ते ७ मार्च नंतर सुरू करण्यात आली आहे. ही बस पर राज्यात जात असल्यामुळे प्रवासी संख्याही या बसला मोठ्या प्रमाणात असते. परंतु, म्हणावी तेवढी काही काळजी घेतली जात नाही. कोरोना आजार वाढू लागल्याने महामंडळाने बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. यासाठी महामंडळाने चालक, वाहकांना सूचना देणे गरजेचे आहे.

कोरोना तपासणीची वेळ वाढविली जाईल

जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढलेले पाहून १ मार्चपासून बसस्थानकात उतरलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाचे पथक नेमण्यास सांगण्यात आले. सर्व बसस्थानकात ही पथके राहतील. शिवाय बसस्थानकातच बस आणून उभी करायची असल्याने सीमेवर तपासणी नाही. जर तीननंतर तपासणी होत नसेल तर तशा सूचना दिल्या जातील.

-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली