शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

आओ जाओ घर तुम्हारा ! दुपारी तीन वाजेनंतर तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने ...

कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न

हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले असतानाही तपासणी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच होताना दिसून येत आहे. त्यानंतर बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे प्रवासी बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना कसा रोखणार? हा प्रश्न पडला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ ते ७ मार्च दरम्यान सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. या दरम्यान, जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील बसेस बाहेरगावी सोडण्याचे बंद केले होते. असे असताना पर जिल्ह्यातील बसेस मात्र आगारात येऊन जात होत्या. जिल्हा प्रशासनाने १ मार्चपासून बसमधून आलेल्या प्रवाशांची तसेच जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, ही वेळ तीन वाजेपर्यंतची देण्यात आली आहे. त्यामुळे तीन नंतर मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे पहायला मिळत आहे.

बॉक्स

लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणी नाही

पुणे, सोलापूर, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या बसेस तिन्ही आगारातून सोडण्यात येत आहेत. परंतु, आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची काही तपासणी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे बहुतांश प्रवासी हे विनामास्कच बसेसमध्ये चढत असल्याचे पहायला मिळत आहे.

इतर राज्यातील बसेस सुरू; पण तपासणी होईना

हिंगोली ते हैदराबाद आणि वसमत ते हैदराबाद ही बस १ ते ७ मार्च नंतर सुरू करण्यात आली आहे. ही बस पर राज्यात जात असल्यामुळे प्रवासी संख्याही या बसला मोठ्या प्रमाणात असते. परंतु, म्हणावी तेवढी काही काळजी घेतली जात नाही. कोरोना आजार वाढू लागल्याने महामंडळाने बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. यासाठी महामंडळाने चालक, वाहकांना सूचना देणे गरजेचे आहे.

कोरोना तपासणीची वेळ वाढविली जाईल

जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढलेले पाहून १ मार्चपासून बसस्थानकात उतरलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाचे पथक नेमण्यास सांगण्यात आले. सर्व बसस्थानकात ही पथके राहतील. शिवाय बसस्थानकातच बस आणून उभी करायची असल्याने सीमेवर तपासणी नाही. जर तीननंतर तपासणी होत नसेल तर तशा सूचना दिल्या जातील.

-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली