शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'किसान ॲप'वरील हवामान बदलाचा अलर्ट मिळतोय, काही तासांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतातील विविध बदल, विविध योजनांची माहिती व्हावी, यातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी शासनाचा ...

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतातील विविध बदल, विविध योजनांची माहिती व्हावी, यातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी शासनाचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना लाभही होत आहे. ॲन्ड्राॅईड मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहिती त्वरित मिळावी व होणारे नुकसान टळावे, यासाठी कृषी विभागाने किसान ॲप विकसित केले. मात्र या ॲपवर उशिरा माहिती मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील तीन पाऊस झाला नाही. मात्र किसान ॲपवर मागील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. २५ मे रोजीही पाऊस होणार असल्याचे सांगितले होते. परंतु, कोठेही पाऊस झाला नाही. मागील आठवड्यात येऊन गेलेल्या तौक्ते वादळाची माहितीही वेळेवर शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते. ही माहिती काही तासांनी मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

किसान ॲपवरून मिळते ही माहिती

१) किसान ॲपवरून हवामान, पीक पेरणी, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची माहिती मिळते.

२) कृषीसंबंधी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते

३) राज्य शासन व केंद्र शासनाच्या कृषी विभागाची माहिती एकमेकांना जोडली असल्याने योजनांची माहिती मिळते.

हे ॲप शेतकऱ्यांसाठी

शेतकऱ्यांना कृषीसंदर्भात माहिती वेळेवर मिळावी, यासाठी विविध ॲप विकसित झाले आहेत. यात कृषिक ॲप, शेतकरी मासिक ॲप, क्रॉप क्लिनिक, कृषी मित्र, किसान भारत, क्रॉप इन्शुरन्स, डिजिटल मंडी भारत, ॲग्रीमार्केट आदी ॲप शेतकऱ्यांसाठी आहेत.

अपडेट वेळेत मिळावे

-किसान ॲपवरून अद्यायावत माहिती वेळेत मिळायला हवी.

- खरीप हंगाम तोंडावर आला असून, पेरणी, बी-बियाणे, खत आदींची माहिती उपलब्ध व्हावी.

- अवकाळी पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट याची माहिती तत्काळ मिळावी.

इशारा मिळाला; पण पाऊस झाल्यावर

मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. मात्र ज्यावेळी पाऊस झाला, त्यावेळी पावसाची कोणतीही शक्यता किसान ॲपने वर्तविली नाही. आता दोन दिवसांपासून पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

- सटवा माखणे

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान होते. वेळेवर माहिती मिळत नसल्याने आर्थिक फटका बसत आहे. किसान ॲप चांगले असले, तरी अद्ययावत माहिती वेळेवर मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

- कल्याण निर्मले