शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
3
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
4
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
5
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
6
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
7
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
8
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
9
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
10
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
11
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
12
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
13
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
14
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
15
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
16
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
17
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
18
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
19
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
20
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा

नाल्या बांधण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST

हिंगोली: शहराच्या जवळ असलेल्या गंगानगर येथे नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना ...

हिंगोली: शहराच्या जवळ असलेल्या गंगानगर येथे नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन या भागामध्ये नाल्या बांधाव्यात, अशी मागणी होत आहे.

विजेचा लपंडाव; पिकांचे नुकसान

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विहिरींना पाणी असूनसुद्धा गहू, हरभरा आदी पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी वेळीच लक्ष देवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी

आंबाचोंडी: मार्च २०२९ पासून वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील रेल्वेसेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे नसल्यामुळे अवैध वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. आंबाचोंडी येथून धावणाऱ्या पूर्णा ते अकोला, परळी ते अकोला, मुदखेड ते अकोला, अकोला ते परळी या पॅसेंजर रेल्वे त्वरित सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केली आहे.

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

हिंगोली: शहरातील शाहूनगर, कमलानगर, इंदिरानगर आदी नगरांमधील रस्ते पूर्णत: उखडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या बाबीची संबंधित विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्ह्यात तूर कापणीला आला वेग

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस व परिसरात गत दोन दिवसांपासून तूर कापणीला वेग आला असून शेतकरी तूर कापणीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची तूर होरपळून गेली आहे. गतवर्षी तुरीचे उत्पन्न चांगले होते. यावर्षी मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

नरसी ते एमआयडीसी रस्त्याचे काम सुरू

हिंगोली: तालुक्यातील नरसी फाटा ते लिंबाळा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम चार दिवसांपासून सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता उखडून ठेवला असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांंना त्रास होत आहे. संबंधित विभागाने काम करताना पर्यायी रस्त्यावर पाणी टाकावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

बसस्थानकातील खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच धूळही वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले, परंतु अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले नाही. बसस्थानकाती खड्डे बुजवून धुळीचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीचा अडथळा

आखाडा बाळापूर: येथील बसस्थानकासमोर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.