शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:00 IST

जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. आरटीई कायद्याची प्रभावीपणे अंमजबावणीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आजघडीला जिल्ह्यात हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे बंधनकार आहे. जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता येईल यासाठी धडपड सुरू आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी बालरक्षक संकल्पना पुढे आली. इतर जिल्ह्यात ही संकल्पा यशस्वी होत आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात बालरक्षकांच्या मदतीने शाळेत न येणाºया मुलांची शोध मोहिम घेण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यात २४ बालरक्षक आहेत. तर कळमनुरी ८८, वसमत ८४, औंढा नागनाथ ४० बालरक्षक शिक्षक आहेत.जिल्ह्यातून काही कुटुंबाचे सहा महिन्या करीता तर काही ३ व २ महिन्याकरीता स्थलांतर होते. कुटुंबासोबत मुलांचेही स्थलांतर होऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही मुले अभ्यासातही मागे पडतात, त्यानंतर शाळाबाह्य होतात. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठवेण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. बालरक्षकामार्फत शाळेत न जाणाºया मुलांना थेट जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. बालरक्षकाची चळवळ गतिमान करून जिल्ह्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मोहिम राबविली जाणार आहे.बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याची दखल घेत तालुकास्तराव कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ६ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी आदेश देताच शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम प्रभाविपणे राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. सेनगाव येथील गटसाधन केंद्रात ९ आॅक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर वसमत ११ आॅक्टोबर कळमनुरी १७ आॅक्टोबर औंढा नागनाथ १५ आॅक्टोबर. अधिव्याख्याता देठे, जिल्हा समन्वयक सुदाम गायकवाड मार्गदर्शन करतील.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा