शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:00 IST

जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. आरटीई कायद्याची प्रभावीपणे अंमजबावणीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आजघडीला जिल्ह्यात हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे बंधनकार आहे. जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता येईल यासाठी धडपड सुरू आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी बालरक्षक संकल्पना पुढे आली. इतर जिल्ह्यात ही संकल्पा यशस्वी होत आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात बालरक्षकांच्या मदतीने शाळेत न येणाºया मुलांची शोध मोहिम घेण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यात २४ बालरक्षक आहेत. तर कळमनुरी ८८, वसमत ८४, औंढा नागनाथ ४० बालरक्षक शिक्षक आहेत.जिल्ह्यातून काही कुटुंबाचे सहा महिन्या करीता तर काही ३ व २ महिन्याकरीता स्थलांतर होते. कुटुंबासोबत मुलांचेही स्थलांतर होऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही मुले अभ्यासातही मागे पडतात, त्यानंतर शाळाबाह्य होतात. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठवेण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. बालरक्षकामार्फत शाळेत न जाणाºया मुलांना थेट जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. बालरक्षकाची चळवळ गतिमान करून जिल्ह्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मोहिम राबविली जाणार आहे.बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याची दखल घेत तालुकास्तराव कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ६ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी आदेश देताच शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम प्रभाविपणे राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. सेनगाव येथील गटसाधन केंद्रात ९ आॅक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर वसमत ११ आॅक्टोबर कळमनुरी १७ आॅक्टोबर औंढा नागनाथ १५ आॅक्टोबर. अधिव्याख्याता देठे, जिल्हा समन्वयक सुदाम गायकवाड मार्गदर्शन करतील.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा