बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी
घरात प्रवेश केल्यानंतर आधी आंघोळ करून घ्यावी. कपडे वेगळे साबणाच्या पाण्यात भिजवायला टाकावेत. कुटुंबात थेट मिसळू नये. स्वतंत्र खोलीत राहावे.
घरात वावरतानाही सामाजिक अंतराचा नियम पाळावा. कुटुंबीयांमध्ये सहभागी होताना मास्कचा वापर करावा. वृद्ध व लहान मुलांपासून दूर राहावे.
जेवताना सहसा कुटुंबीयांसमवेत न जेवता वेगळी वेळ ठेवावी, जेणेकरून जेवताना कधी खोकला आला, ठसका लागला, तर इतरांना संसर्गाची भीती कमी राहील.
ही पाहा उदाहरणे
औंढा नागनाथ येथे एका बाहेर फिरणाऱ्या तरुणामुळे त्यांच्या मुलाला कोरोना झाला. या तरुणाला कोणतीच लक्षणे नव्हती. अचानक या मुलाला ताप आला. एका खासगी रुग्णालयात लहान मुलावर उपचार केले. तो लवकर बरा झाला. मात्र, हा मुलगा आजी व आजोबांच्या अंगावर असल्याने त्यांनाही कोरोना झाला. कधीच घराबाहेर न पडणारे हे दाम्पत्य बाधित झाल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला.
गिरगावात तर याची अनेक उदाहरणे सांगता येतील. या गावात बाहेर फिरणाऱ्या तरुणाईमुळे कधी घराबाहेरही न पडणाऱ्या अनेक वृद्धांना कोरोनाची बाधा झाली. हे लक्षात येण्यास विलंब झाला. परिणामी, अनेकांना ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ येत आहे. वृद्ध बाहेर फिरत नसले, तरीही तरुणांमुळे त्यांना लागण झाली.
सोळा वर्षांखालील पॉझिटिव्ह ९२५
६१ ते १०० वर्षे वयाचे पॉझिटिव्ह १२३६
एकूण पॉझिटिव्ह ६७१६
जिल्ह्यात काेरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. यामध्ये बाहेर फिरणाऱ्यांनी कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. अशांनी बाहेर असताना मास्क काढू नये. सामाजिक अंतर पाळावे, सॅनिटायझर वापरावे. घरी जाताच आंघोळ करावी. घरातही लहान मुले व वृद्धांपासून वेगळे राहावे. ठरावीक काळानंतर कोरोना तपासणी करूनच कुटुंबीयांसमवेत सहभागी व्हावे.
-डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक