शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाच दिवसांत बसेसचा २९ हजार ६० किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

हिंगोली : कोरोना आजार ओसरत चालला असल्याचे पाहून शासनाने ६ जूनपासून लांबपल्ला व साध्या बसेस सुरू करण्याच्या सूचना केल्या ...

हिंगोली : कोरोना आजार ओसरत चालला असल्याचे पाहून शासनाने ६ जूनपासून लांबपल्ला व साध्या बसेस सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. १० जुलै ते १४ जुलैदरम्यान साध्या बससेचा २९ हजार ६० किलोमीटर एवढा प्रवास झाल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या हिंगोली आगाराने दिली.

हिंगोली आगारातून हिंगोली-पुणे २ बसेस आणि हिंगोली-सोलापूर १ अशा दोन लांब पल्ला बसेस दिवसासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. या बसेसचा ११ हजार ५७० किलोमीटर प्रवास झाला आहे, तर हिंगोली-पुणे, हिंगोली-सोलापूर, हिंगोली-कोल्हापूर अशा तीन रातराणी बसेस आहेत. या बसेसचा प्रवास १० हजार ३४० किलोमीटर एवढा झाला आहे.

कोरोना ओसरत चालला असला तरी, कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक आढळून येत आहेत. त्यामुळे सर्व चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक-वाहक प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, अशांची ड्युटी बंद करण्यात येईल, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

लांब पल्ल्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या परभणी, नांदेड, अकोला, वाशिम, रिसोड या जिल्ह्यांसाठी प्रवासी संख्या अधिक मिळत आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. गत पाच दिवसांत साध्या बसेसचा २९ हजार ६० किलोमीटर एवढा प्रवास झाला आहे.

कोरोना काळात आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी हिंगोली-हैदराबाद ही बससेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. पाच दिवसांत या बसचा प्रवास २ हजार २४० किलोमीटर झाला, तर मध्यम लांब पल्ल्यांच्या औरंगाबाद, लातूर या बसेस आहेत. या बसेसचा ६ हजार ३९० किलोमीटर एवढा प्रवास झाला.

बस स्वच्छ करूनच आगारातून काढली जाते...

शासनाच्या निर्देशानुसार हिंगोली आगाराने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. शासनाची सूचना आली नसल्यामुळे ग्रामीण भागात अजून तरी बस जाऊ दिली नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगारातून सर्व बसेस स्वच्छ करूनच बाहेर काढल्या जातात. प्रवाशांनी मास्क घातला नसेल, तर त्यांना बसमध्ये घेऊ नका, अशा सूचनाही वाहकांंना दिल्या आहेत.

- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली