शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाच दिवसांत बसेसचा २९ हजार ६० किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

हिंगोली : कोरोना आजार ओसरत चालला असल्याचे पाहून शासनाने ६ जूनपासून लांबपल्ला व साध्या बसेस सुरू करण्याच्या सूचना केल्या ...

हिंगोली : कोरोना आजार ओसरत चालला असल्याचे पाहून शासनाने ६ जूनपासून लांबपल्ला व साध्या बसेस सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. १० जुलै ते १४ जुलैदरम्यान साध्या बससेचा २९ हजार ६० किलोमीटर एवढा प्रवास झाल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या हिंगोली आगाराने दिली.

हिंगोली आगारातून हिंगोली-पुणे २ बसेस आणि हिंगोली-सोलापूर १ अशा दोन लांब पल्ला बसेस दिवसासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. या बसेसचा ११ हजार ५७० किलोमीटर प्रवास झाला आहे, तर हिंगोली-पुणे, हिंगोली-सोलापूर, हिंगोली-कोल्हापूर अशा तीन रातराणी बसेस आहेत. या बसेसचा प्रवास १० हजार ३४० किलोमीटर एवढा झाला आहे.

कोरोना ओसरत चालला असला तरी, कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक आढळून येत आहेत. त्यामुळे सर्व चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक-वाहक प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, अशांची ड्युटी बंद करण्यात येईल, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

लांब पल्ल्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या परभणी, नांदेड, अकोला, वाशिम, रिसोड या जिल्ह्यांसाठी प्रवासी संख्या अधिक मिळत आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. गत पाच दिवसांत साध्या बसेसचा २९ हजार ६० किलोमीटर एवढा प्रवास झाला आहे.

कोरोना काळात आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी हिंगोली-हैदराबाद ही बससेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. पाच दिवसांत या बसचा प्रवास २ हजार २४० किलोमीटर झाला, तर मध्यम लांब पल्ल्यांच्या औरंगाबाद, लातूर या बसेस आहेत. या बसेसचा ६ हजार ३९० किलोमीटर एवढा प्रवास झाला.

बस स्वच्छ करूनच आगारातून काढली जाते...

शासनाच्या निर्देशानुसार हिंगोली आगाराने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. शासनाची सूचना आली नसल्यामुळे ग्रामीण भागात अजून तरी बस जाऊ दिली नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगारातून सर्व बसेस स्वच्छ करूनच बाहेर काढल्या जातात. प्रवाशांनी मास्क घातला नसेल, तर त्यांना बसमध्ये घेऊ नका, अशा सूचनाही वाहकांंना दिल्या आहेत.

- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली