शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

हिंगोली जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील मुक्कामी बसेस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

हिंगोली : जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वसमत आगार ...

हिंगोली : जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वसमत आगार वगळता दोन तालुक्यांच्या आगारातील मुक्कामी बसेस अजूनही सुरू केल्या गेल्या नाहीत.

मार्च महिन्यापासून कोरोना आजाराने डोके वर काढले होते. एप्रिल ते जुलै या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तिन्ही आगारांतील बसेस बंदच होत्या. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील वसमत आगारातून दररोज २६८, हिंगोली आगारातून दररोज १८९, तर कळमनुरी आगारातून दररोज १३८ बसफेऱ्या होत आहेत. कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मुक्कामी बसेस बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब, पांगरा, तर हिंगोली तालुक्यातील गाडीबोरी, सावरगाव, गांगलवाडी, जयपूर, केंद्रा, तपोवन, शेंदूरसना, ब्राह्मणवाडा, रिसोड, आदी ठिकाणी बसेस लॉकडाऊन आधीपासून मुक्कामी होत्या; परंतु सध्या या ठिकाणच्या मुक्कामी बसेस बंद ठेवल्या आहेत. वसमत आगाराने सर्वच ठिकाणच्या बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनंतर बंद असलेल्या मुक्कामी बसेसही सुरू केल्या जातील, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिक्रिया

सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसेस

सुरुहिंगोली ते परभणी, हिंगोली ते औरंगाबाद, हिंगोली ते कोल्हापूर, हिंगोली ते सोलापूर या मार्गावर महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. हे पाहून महामंडळाने या मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत; परंतु अजूनही म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही.

प्रतिक्रिया

कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील बसेस सुरू केल्या आहेत; परंतु मुक्कामी बस मात्र अजून सुरू केली नाही.

संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली

प्रतिक्रिया

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये बसेस बंद होत्या. त्यामुळे हिंगोली आगाराचे चार लाख आणि कळमनुरी आगाराचे साडेतीन लाखांचे उत्पन्न घटले गेले.

प्रतिक्रिया

हिंगोली ते रिसोड या मार्गावर पूर्वी मुक्कामी बस होती. आता ही बस बंद झाल्याने प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे. महामंडळाने ही बस सुरू करावी.

-अमोल पाईकराव, प्रवासी

प्रतिक्रिया

कळमनुरी ते पांगरा या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आखाडा बाळापूर येथून पांगरा येथे येण्यासाठी रात्रीला बस नसल्याने पूर्वीप्रमाणे बस सुरू करावी.

-राहुल वाढवे, प्रवासी