शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील मुक्कामी बसेस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

हिंगोली : जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वसमत आगार ...

हिंगोली : जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वसमत आगार वगळता दोन तालुक्यांच्या आगारातील मुक्कामी बसेस अजूनही सुरू केल्या गेल्या नाहीत.

मार्च महिन्यापासून कोरोना आजाराने डोके वर काढले होते. एप्रिल ते जुलै या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तिन्ही आगारांतील बसेस बंदच होत्या. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील वसमत आगारातून दररोज २६८, हिंगोली आगारातून दररोज १८९, तर कळमनुरी आगारातून दररोज १३८ बसफेऱ्या होत आहेत. कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मुक्कामी बसेस बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब, पांगरा, तर हिंगोली तालुक्यातील गाडीबोरी, सावरगाव, गांगलवाडी, जयपूर, केंद्रा, तपोवन, शेंदूरसना, ब्राह्मणवाडा, रिसोड, आदी ठिकाणी बसेस लॉकडाऊन आधीपासून मुक्कामी होत्या; परंतु सध्या या ठिकाणच्या मुक्कामी बसेस बंद ठेवल्या आहेत. वसमत आगाराने सर्वच ठिकाणच्या बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनंतर बंद असलेल्या मुक्कामी बसेसही सुरू केल्या जातील, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिक्रिया

सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसेस

सुरुहिंगोली ते परभणी, हिंगोली ते औरंगाबाद, हिंगोली ते कोल्हापूर, हिंगोली ते सोलापूर या मार्गावर महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. हे पाहून महामंडळाने या मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत; परंतु अजूनही म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही.

प्रतिक्रिया

कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील बसेस सुरू केल्या आहेत; परंतु मुक्कामी बस मात्र अजून सुरू केली नाही.

संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली

प्रतिक्रिया

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये बसेस बंद होत्या. त्यामुळे हिंगोली आगाराचे चार लाख आणि कळमनुरी आगाराचे साडेतीन लाखांचे उत्पन्न घटले गेले.

प्रतिक्रिया

हिंगोली ते रिसोड या मार्गावर पूर्वी मुक्कामी बस होती. आता ही बस बंद झाल्याने प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे. महामंडळाने ही बस सुरू करावी.

-अमोल पाईकराव, प्रवासी

प्रतिक्रिया

कळमनुरी ते पांगरा या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आखाडा बाळापूर येथून पांगरा येथे येण्यासाठी रात्रीला बस नसल्याने पूर्वीप्रमाणे बस सुरू करावी.

-राहुल वाढवे, प्रवासी