शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

तुरीच्या उत्पादनात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

करंजी : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. परंतु काढणीच्या अगोदर व काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसल्याने ...

करंजी : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. परंतु काढणीच्या अगोदर व काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगला झाला. यामुळे कापूस, सोयाबीन, मूग आदी पिकांबरोबर शेतकऱ्यांनी तुरीचेही पीक घेतले. अतिवृष्टीने खरीपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान केले. खरीपातील तूर हे पीक तरी साथ देईल, असे वाटले होते. परंतु, वातावरणामुळे तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी परत संकटात सापडला आहे. काढणीच्या अगोदर तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. विविध औषधांची फवारणी करूनही काही उपयोग झाला नाही, असे शेतकऱ्यांच्या म्हणणे आहे. परिसरातील दारेफळ, करंजी, गुंडा, विरेगाव, संगनापूर, कुडाळा, टेंभुर्णी आदी गावात तुरीचे पीक घेतले होते. सध्या तुरीची काढणी व कापणी सुरु आहे. पण, यावर्षी उत्पन्न कमी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तुरीचे उत्पादन चांगले झाले असते, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसाठी औषधी खरेदी करण्यासाठी पैसा हातात आला असता. परंतु, वातावरणामुळे तूर पीकही वाया गेले आहे. शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी एकनाथ मलांडे, तुळशीराम मलांडे, सचिन आव्हाड, बाळू इंगोले, माणिकराव भालेराव, गणेश वालेकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.