शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

तुरीच्या उत्पादनात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

करंजी : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. परंतु काढणीच्या अगोदर व काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसल्याने ...

करंजी : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. परंतु काढणीच्या अगोदर व काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगला झाला. यामुळे कापूस, सोयाबीन, मूग आदी पिकांबरोबर शेतकऱ्यांनी तुरीचेही पीक घेतले. अतिवृष्टीने खरीपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान केले. खरीपातील तूर हे पीक तरी साथ देईल, असे वाटले होते. परंतु, वातावरणामुळे तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी परत संकटात सापडला आहे. काढणीच्या अगोदर तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. विविध औषधांची फवारणी करूनही काही उपयोग झाला नाही, असे शेतकऱ्यांच्या म्हणणे आहे. परिसरातील दारेफळ, करंजी, गुंडा, विरेगाव, संगनापूर, कुडाळा, टेंभुर्णी आदी गावात तुरीचे पीक घेतले होते. सध्या तुरीची काढणी व कापणी सुरु आहे. पण, यावर्षी उत्पन्न कमी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तुरीचे उत्पादन चांगले झाले असते, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसाठी औषधी खरेदी करण्यासाठी पैसा हातात आला असता. परंतु, वातावरणामुळे तूर पीकही वाया गेले आहे. शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी एकनाथ मलांडे, तुळशीराम मलांडे, सचिन आव्हाड, बाळू इंगोले, माणिकराव भालेराव, गणेश वालेकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.