शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सातवांनाही भावली गढाळ्याची शाळा

By admin | Updated: November 16, 2016 18:03 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा.राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा.राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले. वर्षातील संपूर्ण ३६५ दिवसही भरणाऱ्या या शाळेत फाडफाड इंग्रजी बोलणारे, संगणक सहज हाताळणारे व सर्वच विषयांमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी पाहून खासदारांनी ही शाळा मराठवाड्यात मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.

गढाळा येथील शाळेला ग्रामस्थांच्या मदतीचा मोठा हातभार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक साधनांसाठी लोकसहभाग उभारून आपल्या मुलांचे भवितव्य घडविण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. शाळेला शिक्षकही त्याच परंपरेतील लाभल्याने ही शाळा जि.प. शाळा असूनही खाजगी शाळांना लाजवेल, अशा स्थितीत आहे. गुणवत्तेच्या शिखरावर जाण्यासाठी मागील काही वर्षांची मेहनत त्यामागे आहे. या शाळेची महती ऐकल्यानंतर खा.राजीव सातव यांनीही तेथे भेट दिली. प्रत्यक्ष वर्गावर जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फाडफाड इंग्रजी बोलणारे, संगणक सहज हाताळणारे विद्यार्थी इतरही बाबतीत मागे नव्हते. केवळ भेट देण्यासाठी गेलेले खा.सातव तेथे तब्बल दोन तास रमले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचीही बैठक घेतली. तर या शाळेला एक वर्गखोली व वॉटर फिल्टर खासदार निधीतून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर यानंतरही या शाळेसाठी मदत करण्याची तयारी दाखविली. ग्रामस्थ व शिक्षकांच्या परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले. ही शाळा अशीच प्रगतीच्या शिखरावर राहिली तर शहरी विद्यार्थी येथे शिकायला येतील. ही शाळा मराठवाड्यात अग्रेसर राहण्यासाठी कधीही मदतीचा हात पुढेच राहील, अशी ग्वाहीही दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत बापूराव घोंगडे, संतोष खंदारे, शेषराव थोरात, भागोराव थोरात, मुख्याध्यपक उत्तम वानखेडे, शिक्षक सिद्धेश्वर रणखांब व ग्रामस्थ उपस्थित होते.

२00८ पासून उपक्रमही शाळा २00८ पासून एकप्रकारे निवासी आहे. सध्या १ ते ५ वीपर्यंत ८१ विद्यार्थी आहेत. येथील मुले रात्री शाळेतच झोपतात. मुलींना घरी पाठविले जाते. शाळेत सात संगणक, पूर्णपणे रंगरंगोटी, अवांतर ज्ञानासाठी पुस्तके अशी गुरुकुलाप्रमाणे सोय आहे.

मुलांना फायदाया शाळेतील मुलांना सकाळी ४.३0 वाजेपासून अभ्यास, व्यायाम आदींसाठी उठविले जाते. तर चौथी स्कॉलरशिप, नवोदयची तयारीही करून घेतली जाते. मागील वर्षी नवोदयला तीन, चिखलदरा इंग्रजी शाळेत सात मुलांना प्रवेश मिळाला. क्रीडाप्रबोधिनीलाही संधी मिळाली. स्कॉलरशिपही मिळाले.

व्यसनापासून दूरही मुले जास्तीत-जास्त वेळ शाळेतच राहतात. त्यामुळे व्यसनाधिनतेपासून दूर आहेत. मुख्याध्यापक वानखेडे व रणखांब या दोघांवरच शाळेचा डोलारा आहे. दोघांपैकी एकजण मुक्कामी असतो. ते नसतील तर ग्रामस्थांपैकी कोणावर तरी जबाबदारी असते. मात्र शाळा कधी बंद पडू दिली नाही. ३६५ दिवस शाळा सुरू राहतेच.