शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बालकामगार वाढू लागले

By admin | Updated: June 12, 2014 00:21 IST

हिंगोली : बालकामगारांचे प्रमाण कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अपुरी पडू लागले आहेत.

हिंगोली : बालकामगारांचे प्रमाण कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अपुरी पडू लागले आहेत. परिणामी जिल्ह्यात बालकामगारांची संख्या वाढत आहे. बालकेही राष्ट्राची संपत्ती असून, त्यांच्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. या बालकांना सुदृढ बनविणे, ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असली तरी त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी हिंगोली शहरातील विविध भागात फेरफटका मारला असता शहरातील हॉटेल, पानटपरी, बांधकामाचे काम, वाहन दुरूस्तीचे ठिकाण आदी ठिकाणी बालकामगार काम करीत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १ मे २०१२ रोजी आखाडा बाळापूर येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले होते. तसेच या बालकांना पुन्हा कामावर पाठविले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची कडक तंबी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनीही सरकारी कामगार अधिकाऱ्यांना मदत केली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हिंगोली सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने एकाही ठिकाणी कारवाई केलेली नाही. हिंगोली येथील कार्यालयासाठी गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी सरकारी कामगार अधिकारी उपलब्ध नाही. कधी नांदेड तर कधी परभणीच्या अधिकाऱ्यांकडे या पदाचा पदभार दिला जातो. सध्या परभणी येथील अधिकारी कराड यांच्याकडे हिंगोलीचा पदभार आहे. कराड यांनी दोन महिन्यांपूर्वी नांदेडच्या अधिकाऱ्यांकडून पदभार घेतला. त्यांनीही या कालावधीत एकदाही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती यासंदर्भात बालकांकडून काम करून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करते; परंतु जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी गेल्या तीन वर्षांत एकदाही अशी कारवाई केली नाही की, एखाद्या ठिकाणाला भेट दिली नाही. परिणामी बालकामगारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे या बालकांचे पुनर्वसन होत नाही, त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नाहीत. (जिल्हा प्रतिनिधी)