शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सावधान! दुचाकीचोर झालेत सक्रिय

By admin | Updated: May 30, 2017 15:43 IST

हिंगोली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकीसह इतर वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. ती पकडलीही गेली होती. मात्र आता पुन्हा अशी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

 ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 30 - हिंगोली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकीसह इतर वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. ती पकडलीही गेली होती. मात्र आता पुन्हा अशी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून मागील आठ दिवसांत तब्बल दहा ते बारा दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
 
हिंगोली जिल्ह्यात आता दुचाकीचोर सक्रिय झाले आहेत. विशेषत: नव्या व क्रमांक नसलेल्या दुचाकींची चोरी होताना दिसत आहे. काही ठिकाणी तर क्रमांक असूनही दुचाकी लंपास केल्याचे प्रकार घडत आहेत. हिंगोली, वसमतसह ग्रामीण भागातून हे प्रकार सर्रास घडत आहेत. मागील पंधरा दिवसांत वाहने व दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होत आहेत. 
 
सोमवारी तर एकाच दिवशी जिल्हा कचेरीसमोरून एक व बुलडाणा अर्बन बँकेसमोरून एक अशा दोन दुचाकींची चोरी झाली. त्यामुळे या भागात पुन्हा दुचाकीचोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चो-यांच्या इतरही घटना वाढल्या असून हिंगोली जिल्ह्यात कमकुवत पोलीस गस्त हेही एक कारण त्यामागे दिसून येत आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दलाला आता अरविंद चावरिया यांच्या रुपाने नवे दमदार पोलीस अधीक्षक लाभले आहेत. चो-यांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी यंत्रणेला दक्षतेचा कडक इशारा देणे गरजेचे आहे. 
 
यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात वाहनचोरी करणारी टोळी त्या गाडीचे सुटे भाग करून वेगवेगळ्या वाहनांना ते वापरत होती, असे आढळून आले होते. आता पुन्हा दुचाकी चोरीला जात आहेत. त्या अजून तरी सापडत नाहीत. त्यामुळे हेरखाते कामाला लावणे गरजेचे बनले आहे. शिवाय पोलीस वेळेत तक्रार नोंदवून घेत नाहीत. साधा अर्जही घ्यायला कचरतात. यात एखाद्या वाहनचालकाच्या वाहनाचा कुठे दुरुपयोग झाला तर समोरच्याला नाहक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.