शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

सावधान! दुचाकीचोर झालेत सक्रिय

By admin | Updated: May 30, 2017 15:43 IST

हिंगोली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकीसह इतर वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. ती पकडलीही गेली होती. मात्र आता पुन्हा अशी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

 ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 30 - हिंगोली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकीसह इतर वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. ती पकडलीही गेली होती. मात्र आता पुन्हा अशी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून मागील आठ दिवसांत तब्बल दहा ते बारा दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
 
हिंगोली जिल्ह्यात आता दुचाकीचोर सक्रिय झाले आहेत. विशेषत: नव्या व क्रमांक नसलेल्या दुचाकींची चोरी होताना दिसत आहे. काही ठिकाणी तर क्रमांक असूनही दुचाकी लंपास केल्याचे प्रकार घडत आहेत. हिंगोली, वसमतसह ग्रामीण भागातून हे प्रकार सर्रास घडत आहेत. मागील पंधरा दिवसांत वाहने व दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होत आहेत. 
 
सोमवारी तर एकाच दिवशी जिल्हा कचेरीसमोरून एक व बुलडाणा अर्बन बँकेसमोरून एक अशा दोन दुचाकींची चोरी झाली. त्यामुळे या भागात पुन्हा दुचाकीचोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चो-यांच्या इतरही घटना वाढल्या असून हिंगोली जिल्ह्यात कमकुवत पोलीस गस्त हेही एक कारण त्यामागे दिसून येत आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दलाला आता अरविंद चावरिया यांच्या रुपाने नवे दमदार पोलीस अधीक्षक लाभले आहेत. चो-यांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी यंत्रणेला दक्षतेचा कडक इशारा देणे गरजेचे आहे. 
 
यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात वाहनचोरी करणारी टोळी त्या गाडीचे सुटे भाग करून वेगवेगळ्या वाहनांना ते वापरत होती, असे आढळून आले होते. आता पुन्हा दुचाकी चोरीला जात आहेत. त्या अजून तरी सापडत नाहीत. त्यामुळे हेरखाते कामाला लावणे गरजेचे बनले आहे. शिवाय पोलीस वेळेत तक्रार नोंदवून घेत नाहीत. साधा अर्जही घ्यायला कचरतात. यात एखाद्या वाहनचालकाच्या वाहनाचा कुठे दुरुपयोग झाला तर समोरच्याला नाहक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.