शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

बीडीओंना कारणे दाखवा बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:57 IST

मग्रारोहयोच्या कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेवून कोणतीच सुधारणा दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे कोणीच नाव घेत नाही. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोच्या कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेवून कोणतीच सुधारणा दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे कोणीच नाव घेत नाही. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोची आढावा बैठक झाली. यावेळी जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह सर्व तहसीलदार, बीडीओंची उपस्थिती होती. यावेळी जयवंशी म्हणाले, २0१६ पूर्वीचे २२७१ कामे प्रलंबित होती. त्यापैकी १४२८ कामे पूर्ण झाली. उर्वरित अजूनही अपूर्ण आहेत. वारंवार सांगूनही यात काहीच सुधारण होत नसल्याने या आढावा बैठकांचा काय फायदा? असे त्यांनी सुनावले. तर यावेळी सर्व बीडीओंना कारणे दाखवा नोटिसा देण्यास बजावले. कृषीचीही रखडलेली ६३ पैकी १९ कामेच पूर्ण झाली आहेत. यानंतरही सुधारणा न झाल्यास शिस्तभंग अथवा निलंबन करण्याचा इशारा दिला. विहिरींचेही १0 हजारांचे उद्दिष्ट जिल्ह्याला मिळाले असताना केवळ ५0१७ विहिरींच्या कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यातीलही केवळ २८0६ कामे सुरू असून फक्त ४९६ विहिरी दोन वर्षांत पूर्ण झाल्या. ही कामे गतिमान का होत नाहीत, असाही सवाल त्यांनी केला. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी तुम्मोड यांनीही सर्वांना ताकिद देत कामांची गती वाढविण्यास सांगितले.मजुरांना मजुरी वेळेवर मिळण्याची टक्केवारी ८२.५५ तर विलंबाने मिळण्याची टक्केवारी १६.८७ टक्के आहे. ही परिस्थिती चांगली असली तरीही यातही सुधारणा करण्यास वाव असल्याची सूचना जिल्हाधिकाºयांनी दिली. पालकमंत्री पाणंद योजनेतील रस्त्यांच्या कामांकडे तहसीलदार व गटविकास अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. ही कामे तत्काळ सुरू होतील, यासाठी प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले.ग्रामपंचायतींच्या खात्यावर मग्रारोहयो विभागाकडून टाकण्यात आलेली १.८८ कोटींची रक्कम बºयापैकी अखर्चित आहे. यातील काही रक्कम खर्च झाली. तर काही रक्कम ग्रामपंचायतींनी परत केली आहे. उर्वरित ७0 ते ८0 लाखांची रक्कम अजूनही त्यांच्याकडेच आहे. ही रक्कम शासनाकडे जमा करण्याच्या वारंवार सूचना देवूनही ती जमा केली जात नाही. त्यामुळे शासनाकडून नवीन रक्कम देणे बंद झाले आहे. आता तर ही रक्कम दिल्याशिवाय पुढील रक्कम मिळणार नसल्याचेच शासनाने सांगितले. त्यामुळे अखर्चित रक्कम शासनाला परत करण्याची कारवाई तत्काळ पूर्ण करण्यासही जिल्हाधिकाºयांनी बजावले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती