शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बीडीओंना कारणे दाखवा बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:57 IST

मग्रारोहयोच्या कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेवून कोणतीच सुधारणा दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे कोणीच नाव घेत नाही. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोच्या कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेवून कोणतीच सुधारणा दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे कोणीच नाव घेत नाही. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोची आढावा बैठक झाली. यावेळी जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह सर्व तहसीलदार, बीडीओंची उपस्थिती होती. यावेळी जयवंशी म्हणाले, २0१६ पूर्वीचे २२७१ कामे प्रलंबित होती. त्यापैकी १४२८ कामे पूर्ण झाली. उर्वरित अजूनही अपूर्ण आहेत. वारंवार सांगूनही यात काहीच सुधारण होत नसल्याने या आढावा बैठकांचा काय फायदा? असे त्यांनी सुनावले. तर यावेळी सर्व बीडीओंना कारणे दाखवा नोटिसा देण्यास बजावले. कृषीचीही रखडलेली ६३ पैकी १९ कामेच पूर्ण झाली आहेत. यानंतरही सुधारणा न झाल्यास शिस्तभंग अथवा निलंबन करण्याचा इशारा दिला. विहिरींचेही १0 हजारांचे उद्दिष्ट जिल्ह्याला मिळाले असताना केवळ ५0१७ विहिरींच्या कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यातीलही केवळ २८0६ कामे सुरू असून फक्त ४९६ विहिरी दोन वर्षांत पूर्ण झाल्या. ही कामे गतिमान का होत नाहीत, असाही सवाल त्यांनी केला. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी तुम्मोड यांनीही सर्वांना ताकिद देत कामांची गती वाढविण्यास सांगितले.मजुरांना मजुरी वेळेवर मिळण्याची टक्केवारी ८२.५५ तर विलंबाने मिळण्याची टक्केवारी १६.८७ टक्के आहे. ही परिस्थिती चांगली असली तरीही यातही सुधारणा करण्यास वाव असल्याची सूचना जिल्हाधिकाºयांनी दिली. पालकमंत्री पाणंद योजनेतील रस्त्यांच्या कामांकडे तहसीलदार व गटविकास अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. ही कामे तत्काळ सुरू होतील, यासाठी प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले.ग्रामपंचायतींच्या खात्यावर मग्रारोहयो विभागाकडून टाकण्यात आलेली १.८८ कोटींची रक्कम बºयापैकी अखर्चित आहे. यातील काही रक्कम खर्च झाली. तर काही रक्कम ग्रामपंचायतींनी परत केली आहे. उर्वरित ७0 ते ८0 लाखांची रक्कम अजूनही त्यांच्याकडेच आहे. ही रक्कम शासनाकडे जमा करण्याच्या वारंवार सूचना देवूनही ती जमा केली जात नाही. त्यामुळे शासनाकडून नवीन रक्कम देणे बंद झाले आहे. आता तर ही रक्कम दिल्याशिवाय पुढील रक्कम मिळणार नसल्याचेच शासनाने सांगितले. त्यामुळे अखर्चित रक्कम शासनाला परत करण्याची कारवाई तत्काळ पूर्ण करण्यासही जिल्हाधिकाºयांनी बजावले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती