शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST

हिंगोली : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत ...

हिंगोली : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. थकीत कर्जामुळे बँका पुन्हा पीक कर्ज देण्याचे नावही घेत नव्हत्या. मात्र, कर्जमुक्तीनंतर पीक कर्ज देण्यास बँकांनी सुरुवात केल्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे.

खरीप व रबी दाेन्ही हंगामांसाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. घेतलेले पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक असते. मात्र, सततची नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत. थकीत कर्जदाराला बँका पुन्हा नव्याने कर्ज देत नाहीत. मात्र, २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना राबविण्यात आली. या याेजनेंतर्गत २००९ ते २०१६ या कालावधीतील थकीत कर्ज माफ केले. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम मिळण्यास उशीर झाला. तसेच २०१६ नंतरचेही कर्ज माफ हाेईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज भरले नाही. थकीत कर्जदारांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे २०१७ ते २०२० या कालावधीत कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येते. त्यानंतर, पुन्हा विद्यामान राज्य शासनाने २१ डिसेंबर २०१९ राेजी महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा केली. या याेजनेंतर्गत पुन्हा ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज माफ केले. याचा जिल्ह्यातील जवळपास ९० हजार ६३६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा टक्क्याने वाढली असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात २०२०-२१ यावर्षी विविध बँकांमार्फत १४४३ कोटी ७४ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १ लाख ११ हजार शेतकऱ्यांना ७२५ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून याची टक्केवारी ५०.२५ असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितली.

पीक कर्जमाफीनंतर पुन्हा आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँकेतून पीक कर्ज उचलले आहे. कर्जमाफीमुळेच पुन्हा पीक उचलता आले. या रकमेतून खरीप हंगामातील पेरणी करता आली.

-शांताबाई सुधाकर माखणे, साळवा

सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठण करताना अडचणी येत होत्या. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यानंतर बँकेने पुन्हा पीक कर्ज दिले आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी रक्कम कामी आली.

- अरुणा देवीदास माखणे, साळवा

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या - ९०६३६

खरीप पीक कर्जाची आकडेवारी (रक्कम रु. लाखात)

२०१६-१७ -९६८५०.००- ६५७११.३७

२०१७-१८ -८८५२५.०० - १५५८०.९९

२०१८-१९ - ९५९००.०० - २७३१८.८१

२०१९-२० - ११६१९६.७७ -१९२३४.५२

२०२०-२१ - ११६८९५.०० -२०७५८.५३