शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाढत्या तापमानाने केळी उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:55 IST

पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बारमाही बागायती पिके घेतली जातात.यामध्ये प्रामुख्याने हळद व केळी हे प्रमुख पीक आहे

हिंगोली : पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. 

जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बारमाही बागायती पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने हळद व केळी हे प्रमुख पीक असून जवळपास सर्वच ठिकाणी सध्या हळद काढणी अंतीम टप्प्यात आहे. मात्र केळीचे पीक सध्यातरी वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहे. पावसाळ्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. तर सध्या तापमानाचा पारा ४० अंशा सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याने लहान, मोठ्या व विशेषत: वाणगी होत असलेल्या उभ्या केळीबागा करपण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही परिस्थिती आहे, तर एप्रिल व मे हे दोन कडक उन्हाच्या महिन्यांचा विचार करूनच शेतकरी धास्तावत आहेत. 

केळी लागवडीवेळी लागणारी रोपे, कंद विकत घेण्यापासून ते आजपर्यंत संगोपन करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे या बागांचे संगोपन करण्यासाठी शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाला जपले आहे. परंतु, आता वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळून जात असतांनाचे पाहून तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान, मागील महिन्यापासून भूजलपातळी विलक्षण घट झाली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता देखील वाढत असल्याने जूनपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या बागा हाती लागतील का? हे सांगणे सध्या तरी कठिणच दिसत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTemperatureतापमानHingoliहिंगोलीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र