शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर ...

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. एकंदर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम

हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

जड वाहनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक आदी भागामध्ये जड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या बाबीची शहर वाहतूक शाखेने दखल घेऊन जड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी

कळमनुरी : मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. वाहनचालकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची वेळीच दखल घेऊन घाण पाण्याची विल्हेवाट लावून नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. विहिरींना पाणी असूनही वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरात गतिरोधकाची मागणी

हिंगोली : रेल्वे उड्डाण पूल ते बसस्थानकापर्यंत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जड वाहनांचीही या रस्त्यावरून वर्दळ असते. काही वाहनचालक वाहने वेगाने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम अर्धवट

हिंगोली : शहरातील नांदेड नाका ते उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता दगडी चुरी टाकून अर्धवट ठेवण्यात आला आहे. या दगडी चुरीमुळे वाहने चालविणे वाहनचालकांना कठीण झाले आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन दगडी चुरीवर डांबर टाकून चांगल्या पद्धतीने रस्ता तयार करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.