शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर ...

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. एकंदर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम

हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

जड वाहनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक आदी भागामध्ये जड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या बाबीची शहर वाहतूक शाखेने दखल घेऊन जड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी

कळमनुरी : मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. वाहनचालकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची वेळीच दखल घेऊन घाण पाण्याची विल्हेवाट लावून नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. विहिरींना पाणी असूनही वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरात गतिरोधकाची मागणी

हिंगोली : रेल्वे उड्डाण पूल ते बसस्थानकापर्यंत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जड वाहनांचीही या रस्त्यावरून वर्दळ असते. काही वाहनचालक वाहने वेगाने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम अर्धवट

हिंगोली : शहरातील नांदेड नाका ते उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता दगडी चुरी टाकून अर्धवट ठेवण्यात आला आहे. या दगडी चुरीमुळे वाहने चालविणे वाहनचालकांना कठीण झाले आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन दगडी चुरीवर डांबर टाकून चांगल्या पद्धतीने रस्ता तयार करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.