शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर ...

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. एकंदर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम

हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

जड वाहनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक आदी भागामध्ये जड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या बाबीची शहर वाहतूक शाखेने दखल घेऊन जड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी

कळमनुरी : मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. वाहनचालकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची वेळीच दखल घेऊन घाण पाण्याची विल्हेवाट लावून नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. विहिरींना पाणी असूनही वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरात गतिरोधकाची मागणी

हिंगोली : रेल्वे उड्डाण पूल ते बसस्थानकापर्यंत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जड वाहनांचीही या रस्त्यावरून वर्दळ असते. काही वाहनचालक वाहने वेगाने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम अर्धवट

हिंगोली : शहरातील नांदेड नाका ते उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता दगडी चुरी टाकून अर्धवट ठेवण्यात आला आहे. या दगडी चुरीमुळे वाहने चालविणे वाहनचालकांना कठीण झाले आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन दगडी चुरीवर डांबर टाकून चांगल्या पद्धतीने रस्ता तयार करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.