शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यातील धान्य प्रकरण पेटले; दिवसभर मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:00 IST

मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर व्यापा-यांनी मोंढा बंद ठेवला होता.

औंढा नागनाथ : मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर व्यापा-यांनी मोंढा बंद ठेवला होता.

औंढा नागनाथ येथे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची उप बाजारपेठ आहे. या ठिकाणी मोजकेच व्यापारी शेतक-यांचा शेतामध्ये काढलेला माल विकत घेतात व व्यापारी तो माल इतर ठिकाणी विक्रीसाठी नेतात. ४ फेब्रुवारी रोजी बालाजी ट्रेडिंग कंपनीच्या वतीने शेतक-यांकडून खरेदी केलेला गहू हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी ट्रक क्र. एमएच २६ एस ८६६३ मधून १८९ पोते घेवून जात असताना औंढा नागनाथ पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांनी अडविला. याबाबत व्यापारी रामनिवास राठी यांनी विचारले असता पोलिसांनी मिळालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार या ट्रकमध्ये शासकीय धान्य काळ्या बाजारात जात असल्याची असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे हा ट्रक पकडण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृत गुन्हा दाखल न करता महसूलच्या अधिका-यांना त्या ठिकाणी पाचारण करून ट्रकमधील उपलब्ध धान्याचे नमुने घेण्यात आले. सदरील नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. व्यापा-यांना त्रास देण्याच्या उद्देशाने कारवाई केल्याची भावना व्यापा-यांमध्ये निर्माण झाल्याने औंढा येथील व्यापारी संघटनेच्या वतीने यानंतर मोंढ्यामध्ये येणारे शेतक-यांचे धान्य खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरणाची योग्य चौकशी होत नाही, तोपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

औंढा तालुका कृषी खरेदी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम राठी यांना विचारले असता ते म्हणाले, सदरील घटना ही जाणीवपूर्वक केली आहे. व्यापाºयांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम सुरू आहे, केवळ व्यापा-यांना त्रास देण्याचा उद्देशानेच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी असे मत व्यक्त केले. संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात लावलेला ट्रक सोडून देण्याच्या मागणीसाठी जवळाबाजार, शिरडशहापूर, औंढा नागनाथ येथील व्यापाºयांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह तहसीलदारांना बुधवारी निवेदन देण्यात येणार आहे.