शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

औंढ्यातील धान्य प्रकरण पेटले; दिवसभर मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:00 IST

मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर व्यापा-यांनी मोंढा बंद ठेवला होता.

औंढा नागनाथ : मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर व्यापा-यांनी मोंढा बंद ठेवला होता.

औंढा नागनाथ येथे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची उप बाजारपेठ आहे. या ठिकाणी मोजकेच व्यापारी शेतक-यांचा शेतामध्ये काढलेला माल विकत घेतात व व्यापारी तो माल इतर ठिकाणी विक्रीसाठी नेतात. ४ फेब्रुवारी रोजी बालाजी ट्रेडिंग कंपनीच्या वतीने शेतक-यांकडून खरेदी केलेला गहू हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी ट्रक क्र. एमएच २६ एस ८६६३ मधून १८९ पोते घेवून जात असताना औंढा नागनाथ पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांनी अडविला. याबाबत व्यापारी रामनिवास राठी यांनी विचारले असता पोलिसांनी मिळालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार या ट्रकमध्ये शासकीय धान्य काळ्या बाजारात जात असल्याची असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे हा ट्रक पकडण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृत गुन्हा दाखल न करता महसूलच्या अधिका-यांना त्या ठिकाणी पाचारण करून ट्रकमधील उपलब्ध धान्याचे नमुने घेण्यात आले. सदरील नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. व्यापा-यांना त्रास देण्याच्या उद्देशाने कारवाई केल्याची भावना व्यापा-यांमध्ये निर्माण झाल्याने औंढा येथील व्यापारी संघटनेच्या वतीने यानंतर मोंढ्यामध्ये येणारे शेतक-यांचे धान्य खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरणाची योग्य चौकशी होत नाही, तोपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

औंढा तालुका कृषी खरेदी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम राठी यांना विचारले असता ते म्हणाले, सदरील घटना ही जाणीवपूर्वक केली आहे. व्यापाºयांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम सुरू आहे, केवळ व्यापा-यांना त्रास देण्याचा उद्देशानेच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी असे मत व्यक्त केले. संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात लावलेला ट्रक सोडून देण्याच्या मागणीसाठी जवळाबाजार, शिरडशहापूर, औंढा नागनाथ येथील व्यापाºयांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह तहसीलदारांना बुधवारी निवेदन देण्यात येणार आहे.