शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २९ हजार बांधकाम कामगारांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ ...

हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मात्र अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यात सर्वांत जास्त हेळसांड हातावर पोट असणाऱ्या कामगार, मजुरांची झाली. बांधकामे ठप्प असल्याने उपासमार वाढली होती. त्यामुळे शासनाने बांधकाम कामगारांना लॉकडाऊनकाळात अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक कामगारांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या.

कार्यालयाने पुरेशी जनजागृती केली नसल्याने अनेकांना तर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती नव्हती. त्यामुळे अनेक खरे कामगार नोंदणीपासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे कामगारांसाठी फायदेशीर ठरणारा अर्थसहाय्याचा लाभ मोजक्याच खऱ्या कामगारांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या - ४३३०७

लाभ मिळालेले कामगारांची एकूण संख्या - २९२९९

दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार - ३१८८

लॉकडाऊन काळात बांधकामे ठप्प झाल्याने हाताला काम नव्हते. हातऊसने पैसे घेऊन संसाराचा गाडा चालविला. कामगार कार्यालयाकडून अर्थसहाय्य मिळत असल्याचे समजल्याने अर्ज सादर करण्यासाठी गेलो होतो. मात्र दोन दिवस रांगेत उभा राहूनही अर्ज सादर करू शकलो नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले.

- बाबूराव मोरे, अंभेरी

लॉकडाऊन काळात कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागली. लॉकडाऊन काळात देणारे अर्थसहाय्य मिळावे यासाठी कामगार कार्यालयात नोंदणीसाठी गेलो होतो. मात्र पुरेशी कागदपत्रे नव्हती तसेच लॉकडाऊन काळात कागदपत्रे काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले.

-किशन पाईकराव,

३१८८ कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील लाभाची प्रतीक्षा

येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात ५३ हजार ८८२ विविध कामगारांनी नोंदणी केली आहे. मात्र, अनेकांनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे ४३ हजार ३०७ कामगार विविध लाभासाठी पात्र ठरले. त्यात २९ हजार २९९ बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांचे तर २६ हजार १११ कामगारांना ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले. अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

कामगार अधिकारी नॉट रिचेबल

येथील जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे इतर जिल्ह्यांचाही पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीकडील पदभार सांभाळताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहत नसल्याचे चित्र आहे. कामानिमित्त येणाऱ्या कामगारांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यासंदर्भात कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया समजू शकली नाही.