शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यातील २९ हजार बांधकाम कामगारांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ ...

हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मात्र अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यात सर्वांत जास्त हेळसांड हातावर पोट असणाऱ्या कामगार, मजुरांची झाली. बांधकामे ठप्प असल्याने उपासमार वाढली होती. त्यामुळे शासनाने बांधकाम कामगारांना लॉकडाऊनकाळात अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक कामगारांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या.

कार्यालयाने पुरेशी जनजागृती केली नसल्याने अनेकांना तर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती नव्हती. त्यामुळे अनेक खरे कामगार नोंदणीपासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे कामगारांसाठी फायदेशीर ठरणारा अर्थसहाय्याचा लाभ मोजक्याच खऱ्या कामगारांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या - ४३३०७

लाभ मिळालेले कामगारांची एकूण संख्या - २९२९९

दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार - ३१८८

लॉकडाऊन काळात बांधकामे ठप्प झाल्याने हाताला काम नव्हते. हातऊसने पैसे घेऊन संसाराचा गाडा चालविला. कामगार कार्यालयाकडून अर्थसहाय्य मिळत असल्याचे समजल्याने अर्ज सादर करण्यासाठी गेलो होतो. मात्र दोन दिवस रांगेत उभा राहूनही अर्ज सादर करू शकलो नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले.

- बाबूराव मोरे, अंभेरी

लॉकडाऊन काळात कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागली. लॉकडाऊन काळात देणारे अर्थसहाय्य मिळावे यासाठी कामगार कार्यालयात नोंदणीसाठी गेलो होतो. मात्र पुरेशी कागदपत्रे नव्हती तसेच लॉकडाऊन काळात कागदपत्रे काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले.

-किशन पाईकराव,

३१८८ कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील लाभाची प्रतीक्षा

येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात ५३ हजार ८८२ विविध कामगारांनी नोंदणी केली आहे. मात्र, अनेकांनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे ४३ हजार ३०७ कामगार विविध लाभासाठी पात्र ठरले. त्यात २९ हजार २९९ बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांचे तर २६ हजार १११ कामगारांना ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले. अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

कामगार अधिकारी नॉट रिचेबल

येथील जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे इतर जिल्ह्यांचाही पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीकडील पदभार सांभाळताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहत नसल्याचे चित्र आहे. कामानिमित्त येणाऱ्या कामगारांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यासंदर्भात कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया समजू शकली नाही.