शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली

By रमेश वाबळे | Updated: April 3, 2023 19:42 IST

सुमारे साडेपाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हिंगोली: हळद आरोग्यदायी तर मानली जाते. त्यामुळे हळदीला मोठे महत्व असून, मागील काही वर्षात शेतकऱ्यांसाठीही हळदीचे पीक परवडणारे ठरत आहे. यंदा हळदीचे उत्पादन समाधानकारक झाले असून, ३ एप्रिल रोजी येथील मोंढ्यात तब्बल ११ हजार कट्ट्यांची आवक झाली. ५ हजार ५०० ते ६ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

जिल्ह्यात यंदा ३४ हजार २३० हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ हजार हेक्टरने लागवड घटली तरी उत्पादन समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील पंधरवड्यापासून येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये नवी हळद विक्रीसाठी येत आहे. आत्तापर्यंत सरासरी दोन हजार क्विंटलची आवक होत होती. परंतु, मार्चएंन्डमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे मार्केट यार्ड तीन दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर ३ एप्रिल रोजी मार्केट यार्ड सुरू झाले. 

या दिवशी तब्बल ११ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली. सुमारे साडेपाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच हळद टाकण्यासाठी शेडमध्ये जागाही अपुरी पडली होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची हळद सायंकाळपर्यंत वाहनातच होती. वाहनातील हळदीचा एक कट्टा काढून त्याचा लिलाव करण्यात आला. त्यानुसार संबंधीत शेतकऱ्याच्या हळदीला भाव दिल्या गेला. आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मोजमापाचे काम ४ एप्रिल रोजीही दिवसभर चालेल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली