शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नगरपालिकेच्या १४५ घरकुलांच्या विशेष प्रकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:50 IST

या योजनेत लाभार्थ्यांना ३00 स्क्वेअर फुटांपर्यंतचे बांधकाम करता येते. त्यासाठी अडीच लाखांचे अनुदान शासन देते.

ठळक मुद्देनगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षीपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे सुरू

हिंगोली : शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत ९५९ घरकुलांचा प्रकल्प आधीच मंजूर असताना आता अपंग, विधवा, सफाई कामगार अशा एकूण १३९ जणांसाठी घरकुलांचा विशेष प्रकल्प मंजूर झाला आहे. लवकरच ही कामेही सुरू केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

हिंगोली नगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षीपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे सुरू झाली आहेत. हिंगोलीसाठी प्रधानमंत्री घरकुलमध्ये वेगवेगळे तीन विकास आराखडे मंजूर झाले होते. यात ६0९, १५0 व २00 घरकुलांचे हे आराखडे होते. याची एकूण संख्या ९५९ एवढी आहे. तर यापैकी ८१२ घरकुलांचे काम सुरू करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना ३00 स्क्वेअर फुटांपर्यंतचे बांधकाम करता येते. त्यासाठी अडीच लाखांचे अनुदान शासन देते. यापेक्षा जास्त बांधकाम होत असल्यास लाभार्थ्यांना पदरमोड करावी लागते. यामध्ये लाभार्थ्यांच्या गरजेनुरुप सोय होईल, अशी व्यवस्था केली आहे. या योजनेत ५00 कामे सुरू असून १५६ घरकुलांचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

सध्या जी कामे सुरू झाली त्यामध्ये ४६५ घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. यापैकी ३४५ घरकुलांचे काम पुढच्या टप्प्यात गेल्याने त्यांना दुसरा हप्ताही वितरित केला होता. तर २१३ जणांना तिसरा हप्ता वितरित केला आहे. त्यामुळे ही कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पूर्ण झाल्यास एकूण कामे पूर्ण होत असल्याची संख्या साडेतीनशेच्या पुढे जाणार आहे. मध्यंतरी या योजनेत निधीची अडचण असल्याने लाभार्थ्यांची ओरड होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासनही हैराण होते. न.प. पदाधिकाºयांना भेटण्यासाठी अनेकदा शिष्टमंडळे येत होती. नगरसेवकांसाठीही ही बाब डोकेदुखी बनली होती. त्यामुळे प्रशासनही अडचणीत सापडले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरणाचे कामही सुरू आहे. त्याचबरोबर ज्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित झाला, अशा लाभार्थ्यांनी आपल्या कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे येत्या मार्च एण्डपर्यंत जास्तीत-जास्त कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

आचारसंहितेत फटका; कामे लांबलीमागील वर्षभरात दोनदा आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना मंजूर घरकुलाच्या निधीसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. ज्यांना दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळायचा होता, अशांची कमी मात्र पहिलाच हप्ता मिळण्यासाठी दोनदा आचारसंहितेच्या कचाट्यात लाभार्थी सापडले होती. या आचारसंहितेच्या काळातील निधी वितरणाच्या बंधनामुळे कामे लांबली आहेत. अनेकांनी घराचे बांधकाम होणार असल्याने पूर्वीचा निवारा पाडल्याने अशांना तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर अनेकांनी भाड्याचे घर घेतल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागला. यापुढे या कामात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. लाभार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर वेळेत निधी मिळेल. उर्वरित लाभार्थ्यांनीही कामे सुरू करावी. ज्यांना आदेश मिळाले त्या सर्वांनी घरकुलाचे काम सुरू करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघरGovernmentसरकार