शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:30 AM

शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे.ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाºया अनेक बेघरांना घरकुल योजनेत लाभ मिळाला. मात्र आता जागा नसल्याने पेच निर्माण झाला आहे. गाव नमुना क्र.८ ला नोंद असूनही या जागेची मालकी शासकीय असल्याने त्यांना घरकुल बांधकामास परवानगी मिळत नव्हती. खास घरकुल योजनेसाठी काढलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मालमत्ताधारकाच्या नावापुढे सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्यास ग्रामसेवकाने तसे प्रमाणित करायचे आहे. विस्तार अधिकाºयांनी त्याची काटेकोर तपासणी करून पंचायत समितीत सादर करायचे आहे. हे संगणकप्रणालीवर अपलोड करायचे आहे. त्यात केंद्रचालकाने डाटा एन्ट्री करताना कुणालाही वगळले नाही, याची ग्रामसेवकाने खात्री करून आॅनलाईन प्रमाणित करायचे आहे. ही यादी ग्रा.पं.त प्रसिद्ध करायची आहे. ही यादी ग्रामसभेतही प्रसिद्ध करायची आहे. यावर आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत देऊन ग्रामसभेनेही त्यास मान्यता दिल्यास आॅनलाईन प्रमाणित करायचे आहे. तर आक्षेप आल्यास त्यावर करावयाची प्रक्रियाही या शासन निर्णयात दिली आहे.यापूर्वी शासनाने दीनदयाल उपाध्याय योजनेत घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ठराविक रक्कम देण्याची योजना काढली होती. मात्र त्यात तुटपुंजी रक्कम मिळत होती. तर जागेचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे ती अपयशी ठरली. शासकीय जागेवर अतिक्रमणाची जागा चालत नव्हती. तर नवीन जागा मिळत नव्हती.अनेक घरकुले अपूर्ण : शेकडो रद्दही !२0१२-१३ पासून जागेसह इतर समस्येमुळे काही घरे रखडली तर काही रद्दच केली. २0१२-१३ ची अपूर्ण ४0 तर ९ रद्द, १३-१४ ला १५ अपूर्ण तर ८ रद्द २0१४ -१५ मध्ये ५0३ अपूर्ण तर १0६ रद्द करण्यात आली आहेत. तर २0१५-१६ मध्ये सर्वाधिक ७0६ अपूर्ण तर ४१ रद्द करण्यात आली होती.२0१६-१७ पासून चार हप्त्यांत घरकुलाचे आॅनलाईन काम सुरू झाले. यात प्रधानमंत्री आवासची २0१६-१७ मध्ये ३४३८ पैकी २६४१, रमाईची ९९२ पैकी ६७८, शब्री योजनेत २२६ पैकी १६४, पारधी योजनेत १३ पैकी ८ कामेच पूर्ण झाली आहेत.गरीब असूनही यादीत न आलेल्यांना प्रपत्र ड मध्ये नोंदवून घेण्यास आता ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी एक मोबाईल अ‍ॅपही काढण्यात आले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारHingoliहिंगोली