शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अडीच महिने उलटूनही हरभऱ्याचा निर्णय होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:46 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही.जून महिन्यात फक्त पाचच दिवस नाफेडमार्फत येथील बाजार समितीने ५६ शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी केली. त्यापैकी ५२ शेतकºयांना त्याची हरभरा विक्रीनंतरची रक्कम आॅनलाईन मिळालेली आहे. परंतु ४ शेतकºयांना ती मिळालेली नाही. हे शेतकरी बाजार समितीत चकरा मारत आहेत. बाजार समितीत हरभरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी केली नाही. शेतकºयांच्या रेट्यानंतर जून महिन्यात फक्त ५ दिवसच खरेदी केली. २९ जूनपर्यंत ५६ शेतकºयांचा हरभरा खरेदी केला. हजारो क्विंटल हरभºयाला ४४०० रुपये हमीभाव देण्यात आला. शेतकºयांचा प्रतिहेक्टरी १० क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे निर्देश होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांचाच हरभरा खरेदी करण्यात आला. आॅनलाईन नोंदणी केलेल्या काही शेतकºयांचा सोयाबीन अजूनही नाफेडने खरेदी केलेला नाही. बाजारात जास्त भाव असल्याने काही शेतकºयांनी नाफेडला सोयाबीन देण्याचे टाळल्याचे बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी सांगितले.आॅनलाईन : नोंदणी होऊनही खरेदी नाहीकळमनुरी येथील नाफेड केंद्रात हरभरा विक्रीसाठी ९७४ शेतकºयांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली. अडीच महिन्याचा कालावधी झाला तरी नाफेडने त्यांच्या हरभºयाची खरेदी केली नाही. ३० जूनपासून हरभरा खरेदी बंद करण्याचे आदेश बाजार समितीला शासनाने दिल्यानंतर पुढे बाजारसमितीने हरभरा खरेदी बंद केली होती. त्यामुळे ९७४ शेतकºयांना आपला हरभरा विक्री करताना आला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून नोंदणी झालेले सर्वच शेतकरी नाफेड केंद्रावर रोष व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे.बाजार समितीकडे हरभरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी झाली नाही. शासनाकडूनच खरेदी बंद झाली होती, असे बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी सांगितले.मी नाफेड केंद्रावर १२ एप्रिल रोजी १३ क्विंटल तूर विक्री केली. जवळाबाजार येथील नाफेड केंद्रावर चकरा मारून हैराण झालो आहे. या केंद्राची मी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार केली तरी काहीच कार्यवाही होत नाही. असे माणिकराव नागरे या शेतकºयाने सांगितले.पाच महिने झाले तरीही तुरीचे चुकारे मिळेनातजवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील नाफेडच्या हमीभाव केंद्रावर तूर विक्री करणाºया शेतकºयांना अजूनही चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे या केंद्रावर शेतकरी चकरा मारून हैराण झाले आहेत. या शासनाच्या आधारातून किंमतीनुसार नाफेड खरेदी केंद्र सुरू झाले. या ठिकाणी २३७० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यामध्ये १५ मे रोजी १५३९ शेतकºयाची १४९० तुर खरेदी झाली होती. मात्र आॅनलाईनमुळे अनेक शेतकºयांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत. फेबु्रवारी, एप्रिल या महिन्यात विक्री केलेल्या तूर उत्पादक शेतकºयांना पाच महिने उलटले तरीही चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी जवळाबाजार येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत. तर त्यामुळे शिल्लक तुरीचे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न शेतकºयांमधून विचारला जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी