शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अडीच महिने उलटूनही हरभऱ्याचा निर्णय होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:46 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही.जून महिन्यात फक्त पाचच दिवस नाफेडमार्फत येथील बाजार समितीने ५६ शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी केली. त्यापैकी ५२ शेतकºयांना त्याची हरभरा विक्रीनंतरची रक्कम आॅनलाईन मिळालेली आहे. परंतु ४ शेतकºयांना ती मिळालेली नाही. हे शेतकरी बाजार समितीत चकरा मारत आहेत. बाजार समितीत हरभरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी केली नाही. शेतकºयांच्या रेट्यानंतर जून महिन्यात फक्त ५ दिवसच खरेदी केली. २९ जूनपर्यंत ५६ शेतकºयांचा हरभरा खरेदी केला. हजारो क्विंटल हरभºयाला ४४०० रुपये हमीभाव देण्यात आला. शेतकºयांचा प्रतिहेक्टरी १० क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे निर्देश होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांचाच हरभरा खरेदी करण्यात आला. आॅनलाईन नोंदणी केलेल्या काही शेतकºयांचा सोयाबीन अजूनही नाफेडने खरेदी केलेला नाही. बाजारात जास्त भाव असल्याने काही शेतकºयांनी नाफेडला सोयाबीन देण्याचे टाळल्याचे बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी सांगितले.आॅनलाईन : नोंदणी होऊनही खरेदी नाहीकळमनुरी येथील नाफेड केंद्रात हरभरा विक्रीसाठी ९७४ शेतकºयांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली. अडीच महिन्याचा कालावधी झाला तरी नाफेडने त्यांच्या हरभºयाची खरेदी केली नाही. ३० जूनपासून हरभरा खरेदी बंद करण्याचे आदेश बाजार समितीला शासनाने दिल्यानंतर पुढे बाजारसमितीने हरभरा खरेदी बंद केली होती. त्यामुळे ९७४ शेतकºयांना आपला हरभरा विक्री करताना आला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून नोंदणी झालेले सर्वच शेतकरी नाफेड केंद्रावर रोष व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे.बाजार समितीकडे हरभरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी झाली नाही. शासनाकडूनच खरेदी बंद झाली होती, असे बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी सांगितले.मी नाफेड केंद्रावर १२ एप्रिल रोजी १३ क्विंटल तूर विक्री केली. जवळाबाजार येथील नाफेड केंद्रावर चकरा मारून हैराण झालो आहे. या केंद्राची मी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार केली तरी काहीच कार्यवाही होत नाही. असे माणिकराव नागरे या शेतकºयाने सांगितले.पाच महिने झाले तरीही तुरीचे चुकारे मिळेनातजवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील नाफेडच्या हमीभाव केंद्रावर तूर विक्री करणाºया शेतकºयांना अजूनही चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे या केंद्रावर शेतकरी चकरा मारून हैराण झाले आहेत. या शासनाच्या आधारातून किंमतीनुसार नाफेड खरेदी केंद्र सुरू झाले. या ठिकाणी २३७० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यामध्ये १५ मे रोजी १५३९ शेतकºयाची १४९० तुर खरेदी झाली होती. मात्र आॅनलाईनमुळे अनेक शेतकºयांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत. फेबु्रवारी, एप्रिल या महिन्यात विक्री केलेल्या तूर उत्पादक शेतकºयांना पाच महिने उलटले तरीही चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी जवळाबाजार येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत. तर त्यामुळे शिल्लक तुरीचे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न शेतकºयांमधून विचारला जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी