शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

तब्बल २६ तासानंतर मृतदेह घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:15 IST

ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांचा पोलिस वाहनात झालेल्या मृत्यूप्रकरणी मयताचा नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर तब्बल २६ तासानंतर शनिवारी रात्री अकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांचा पोलिस वाहनात झालेल्या मृत्यूप्रकरणी मयताचा नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर तब्बल २६ तासानंतर शनिवारी रात्री अकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतला.सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांना ताब्यात घेतले होते. यावेळी बेंगाळ यांना पोलीस वाहनातून आणत असताना वाहनातच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस मारहाणीत ग्रामसेवक बेंगाळ यांचा मृत्यू झाला. असा आरोप करीत संबंधित पोलिस कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणी करिता शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सेनगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. याप्रकरणी तब्बल २४ तास तोडगा निघाला नसल्याने संबंधित पोलिस अधिकारी मयताच्या नातेवाईकांचे समाधान करू शकले नाही. त्यामुळे मृतदेह २४ तास पडून होता.खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत सेनगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. तर पोलीस यंत्रणा सीआयडी तपास झाल्यानंतर गुन्हा दाखल करू या भूमिकेवर ठाम होती. त्यातून मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणात आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मयताच्या नातेवाईकांची व संबंधित पोलिस अधिकाºयांची भेट घेऊन तोडगा काढला. त्यात कारवाईत सहभागी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ५ पोलीस कर्मचाºयांना शनिवारी रात्री उशिरा निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकानी काढले. त्यानंतर मयत ग्रामसेवक बेंगाळ यांच्या नातेवाईकांनी तब्बल २६ तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मध्यरात्री १ वाजता मयतावर कोळसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सदर प्रकरण हाताळण्यात सेनगाव पोलीसाना अपयश आले. तब्बल २४ तास पोलीस ठाण्यातून जमाव हटला नाही. अशा परिस्थितीत तणाव निर्माण झाला.पोलीस प्रशासनाने प्रकरण हाताळणी करताना गांभीर्य घेतले नसल्याने हा प्रकार घडला. ग्रामसेवक बेंगाळ यांच्या मृत्यू प्रकरणाची पुढील तपास सीआयडी करणार आहे. असे असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध व्यवसाय, त्याला स्थानिक पोलीस यंत्रणे कडून मिळणारे पाठबळ, केलेले दुर्लक्ष अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत ग्रामसेवकाचा झालेला मृत्यु आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती या सर्व प्रकरणांची वेगळी चौकशी करण्याची गरज आहे.या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी