शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:46 IST

पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.जिल्ह्यातील विविध राष्टÑीयीकृत बँकेत आजही पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी खेटे घेत आहेत. तर बºयाच बँकेतील शाखाधिकारी शेतकºयांचे साधे बोलणेही ऐकायला तयार नसल्याचे चित्र आहे. बहुतांश बँकेत दलालांमार्फत पीककर्ज वाटपाला तेवढा प्रतिसाद मिळाला. त्यातच पीक कर्ज वाटपाच्या कागदपत्र जुळवा - जुळवीत शेतकरी हैराण झाल्याचे पहायला मिळाले. यात मात्र काही केल्या एका फेरीत त्याचे काम होईल याची शाश्वतीच नाही. अनेकदा तर बँकेतील अधिकाºयांची प्रतीक्षा करीत शेतकरी रिकाम्या हाताने परतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता पीककर्ज वाटपाला पीकविम्याची मुदत संपताच अनेकांनी ब्रेक दिला असल्याचेही चित्र आहे. पीकविम्याचा लाभ सोबतच द्यावयाचा असल्याने ही कारणे सांगून काहींनी संचिका थोपवून धरल्या आहेत.हिंगोली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने १४ हजार ९८२ शेतकºयांना ३१.२0 कोटींचे कर्जवाटप केले. हे प्रमाण २३ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ७ हजार शेतकºयांना ६८.७९ कोटींचे कर्जवाटप केले. या बँकांनी ७२0 कोटींचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट दिले होते. ते फक्त ९.५६ टक्के पूर्ण केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४४३५ शेतकºयांना ३४ कोटी वाटले. हे प्रमाण ३३.0५ टक्के आहे.९५९ कोटींचा लक्षांक असताना बँकांनी केवळ १३४ कोटींचे पीककर्ज वाटले आहे.जिल्ह्यातील बँकाची पीककर्ज वाटपासाठी नकारघंटा आहे. त्यातच नवीन सभासदांना अद्यापपर्यंत ६९ कोटी ८६ लाख ५७ एवढे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७९ शेतकºयांना ११ कोटी ८५ लाख तर व्यापारी बँकाकडून ४ हजार ७०४ शेतकºयांना ४७ कोटी २ लाख तर ग्रामीण बँकेतून ३ हजार १६६ शेतकºयांना २२ कोटी ७१ लाख असे एकूण ७ हजार ९४९ शेतकºयांना ६९ कोटी ८६ लाख ५७ हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी