शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:46 IST

पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.जिल्ह्यातील विविध राष्टÑीयीकृत बँकेत आजही पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी खेटे घेत आहेत. तर बºयाच बँकेतील शाखाधिकारी शेतकºयांचे साधे बोलणेही ऐकायला तयार नसल्याचे चित्र आहे. बहुतांश बँकेत दलालांमार्फत पीककर्ज वाटपाला तेवढा प्रतिसाद मिळाला. त्यातच पीक कर्ज वाटपाच्या कागदपत्र जुळवा - जुळवीत शेतकरी हैराण झाल्याचे पहायला मिळाले. यात मात्र काही केल्या एका फेरीत त्याचे काम होईल याची शाश्वतीच नाही. अनेकदा तर बँकेतील अधिकाºयांची प्रतीक्षा करीत शेतकरी रिकाम्या हाताने परतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता पीककर्ज वाटपाला पीकविम्याची मुदत संपताच अनेकांनी ब्रेक दिला असल्याचेही चित्र आहे. पीकविम्याचा लाभ सोबतच द्यावयाचा असल्याने ही कारणे सांगून काहींनी संचिका थोपवून धरल्या आहेत.हिंगोली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने १४ हजार ९८२ शेतकºयांना ३१.२0 कोटींचे कर्जवाटप केले. हे प्रमाण २३ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ७ हजार शेतकºयांना ६८.७९ कोटींचे कर्जवाटप केले. या बँकांनी ७२0 कोटींचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट दिले होते. ते फक्त ९.५६ टक्के पूर्ण केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४४३५ शेतकºयांना ३४ कोटी वाटले. हे प्रमाण ३३.0५ टक्के आहे.९५९ कोटींचा लक्षांक असताना बँकांनी केवळ १३४ कोटींचे पीककर्ज वाटले आहे.जिल्ह्यातील बँकाची पीककर्ज वाटपासाठी नकारघंटा आहे. त्यातच नवीन सभासदांना अद्यापपर्यंत ६९ कोटी ८६ लाख ५७ एवढे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७९ शेतकºयांना ११ कोटी ८५ लाख तर व्यापारी बँकाकडून ४ हजार ७०४ शेतकºयांना ४७ कोटी २ लाख तर ग्रामीण बँकेतून ३ हजार १६६ शेतकºयांना २२ कोटी ७१ लाख असे एकूण ७ हजार ९४९ शेतकºयांना ६९ कोटी ८६ लाख ५७ हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी