शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:46 IST

पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.जिल्ह्यातील विविध राष्टÑीयीकृत बँकेत आजही पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी खेटे घेत आहेत. तर बºयाच बँकेतील शाखाधिकारी शेतकºयांचे साधे बोलणेही ऐकायला तयार नसल्याचे चित्र आहे. बहुतांश बँकेत दलालांमार्फत पीककर्ज वाटपाला तेवढा प्रतिसाद मिळाला. त्यातच पीक कर्ज वाटपाच्या कागदपत्र जुळवा - जुळवीत शेतकरी हैराण झाल्याचे पहायला मिळाले. यात मात्र काही केल्या एका फेरीत त्याचे काम होईल याची शाश्वतीच नाही. अनेकदा तर बँकेतील अधिकाºयांची प्रतीक्षा करीत शेतकरी रिकाम्या हाताने परतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता पीककर्ज वाटपाला पीकविम्याची मुदत संपताच अनेकांनी ब्रेक दिला असल्याचेही चित्र आहे. पीकविम्याचा लाभ सोबतच द्यावयाचा असल्याने ही कारणे सांगून काहींनी संचिका थोपवून धरल्या आहेत.हिंगोली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने १४ हजार ९८२ शेतकºयांना ३१.२0 कोटींचे कर्जवाटप केले. हे प्रमाण २३ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ७ हजार शेतकºयांना ६८.७९ कोटींचे कर्जवाटप केले. या बँकांनी ७२0 कोटींचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट दिले होते. ते फक्त ९.५६ टक्के पूर्ण केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४४३५ शेतकºयांना ३४ कोटी वाटले. हे प्रमाण ३३.0५ टक्के आहे.९५९ कोटींचा लक्षांक असताना बँकांनी केवळ १३४ कोटींचे पीककर्ज वाटले आहे.जिल्ह्यातील बँकाची पीककर्ज वाटपासाठी नकारघंटा आहे. त्यातच नवीन सभासदांना अद्यापपर्यंत ६९ कोटी ८६ लाख ५७ एवढे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७९ शेतकºयांना ११ कोटी ८५ लाख तर व्यापारी बँकाकडून ४ हजार ७०४ शेतकºयांना ४७ कोटी २ लाख तर ग्रामीण बँकेतून ३ हजार १६६ शेतकºयांना २२ कोटी ७१ लाख असे एकूण ७ हजार ९४९ शेतकºयांना ६९ कोटी ८६ लाख ५७ हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी