शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मोठी माणसे अर्धपोटी राहू शकतात, लेकराबाळांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

हिंगोली: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांना मागील पाच दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटीच रात्र काढण्याची वेळ आली आहे. ...

हिंगोली: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांना मागील पाच दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटीच रात्र काढण्याची वेळ आली आहे. मोठी माणसे अर्धपोटी राहू शकतात; पण लेकराबाळांचे काय? असा खडा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे.

मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च अशी सात दिवस जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. शहरातील अकोला रोड, खटकाळी बायपास आदी मोकळ्या जागी पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेश तसेच विदर्भातून ५० कुटुंब हिंगोलीत दाखल झाले आहेत. मजुरी कामाबरोबर गॅस दुरुस्ती करणे, कूकर दुरुस्ती करणे, शेगड्या दुरुस्त करणे आदी कामे ही मंडळी करीत आहेत. याचबरोबर ऊस तोड आणि शेतातील कामावरही ही मजूर मंडळी जात असते. दरवर्षी कामाच्या शोधात हे मजूर हिंगोली जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यांतही वास्तव्य करून राहत आहेत.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने डोके वर काढले. पाच महिने तर उपाशीपोटीच रहावे लागले. त्यावेळेस जिल्हा प्रशासनाने माणसी पाच किलोप्रमाणे अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या. जिल्हा प्रशासन काळजी घेत असले तरी कोरोना कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, आमच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे अर्धपोटी उपाशी राहण्याची वेळ पालामध्ये राहणाऱ्या मजुरांवर आली आहे.

काबाडकष्ट केले तरच घरात धान्य येईल

कोरोनामुळे घरात बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नाही म्हटले एका पालमध्ये चार सदस्य आहेत. असे जवळपास पन्नास ते साठ मजूर कुटुंब आजमितीस हिंगोली शहरात राहत आहे. मजुरीशिवाय आमच्याजवळ कोणताही पर्याय नसल्यामुळे लॉकडाऊन केले की आम्हाला व लेकराबाळांना उपाशी राहण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तेव्हा जिल्हा प्रशासनाने पालांमधील मजुरांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मजुरांनी केली आहे.

फोटो एचएनएलपी६