शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:06 IST

२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देसकल मराठा समाज हिंगोलीत झाली बैठकभविष्यात लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

हिंगोली : राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच राज्य सरकारकडे मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे, ईएसबीसी ही आरक्षणाची पद्धत नसून ही केवळ सवलत आहे. त्यामुळे भविष्यातसुद्धा मराठा समाजाचा लढा सुरूच राहील. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभरात ५८ च्यावर मोर्चे काढण्यात आले आहेत. अखेर शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती पाहण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वे केला. यामध्ये मराठा समाज मागास असल्याचे स्पष्ट झाले असून तसा अहवालही आयोगाने राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच ईएसबीसी हा आरक्षणाचा प्रवर्ग नसून ती केवळ एक सवलत आहे, अशीही चर्चा या बैठकीत झाली. तसेच राज्यभरात मराठा जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर, सर्कलनिहाय यासंदर्भात बैठकाही घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील मराठा समाजातील हजारो बांधवांनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीला जिल्हाभरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षण