शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:06 IST

२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देसकल मराठा समाज हिंगोलीत झाली बैठकभविष्यात लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

हिंगोली : राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच राज्य सरकारकडे मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे, ईएसबीसी ही आरक्षणाची पद्धत नसून ही केवळ सवलत आहे. त्यामुळे भविष्यातसुद्धा मराठा समाजाचा लढा सुरूच राहील. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभरात ५८ च्यावर मोर्चे काढण्यात आले आहेत. अखेर शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती पाहण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वे केला. यामध्ये मराठा समाज मागास असल्याचे स्पष्ट झाले असून तसा अहवालही आयोगाने राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच ईएसबीसी हा आरक्षणाचा प्रवर्ग नसून ती केवळ एक सवलत आहे, अशीही चर्चा या बैठकीत झाली. तसेच राज्यभरात मराठा जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर, सर्कलनिहाय यासंदर्भात बैठकाही घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील मराठा समाजातील हजारो बांधवांनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीला जिल्हाभरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षण