शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अतिवृष्टीने झोडपलेले गारखेडा गाव निघाले चक्क विक्रीला; विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तीन महिन्यांपासून गाव अंधारात

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: October 16, 2022 19:17 IST

हिगोंली येथील गोरेगावमधील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तीन महिन्यांपासून एक गाव अंधारात आहे. 

गोरेगाव (हिंगोली) : अतिवृष्टीची मदत नाही, पीक विमापण मिळत नाही, अशा परिस्थितीत बिल थकबाकीमुळे विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. यामुळे सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्क गावच विक्रीला काढत इच्छा मरणाची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेले निवेदन गोरेगाव पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.

चालू वर्षासह गत तीन वर्षांपासून सतत अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत विद्युत बिल थकले आहे. असे असताना वीज वितरण कंपनीकडून गारखेडा येथील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आल्याने दोन ते अडीच महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. परिणामी सण, उत्सवावर अंधाराचे सावट पसरले. विजेअभावी नागरी सेवा सुविधा बंद पडल्या असून शेजारच्या कडोळी गावातून पाणी व दळण दळून आणावे लागत आहे. वारंवार विनंती करूनही विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नसताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून थेट गाव विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावर स्वप्निल पाटील, अरुण पाटील, शामराव वाघमारे, प्रमिला वाघमारे, गणपत राऊत, नीलेश मेहकरे, पूजा वाघमारे, अरविंद मेहकरे, ज्योती वाघमारे, छाया वाघमारे, लक्ष्मी वाघमारे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा....अतिवृष्टीची मदत आणि पीक विमा लाभ मिळाला नाही. त्यातच वीज कंपनी व खाजगी फायनान्स कंपन्या वसुलीसाठी तगादा लावीत असल्याने शेतजमिनी व गुराढोरांसह गाव विक्री करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा तत्काळ जोडण्यासह तत्काळ अतिवृष्टी मदतीसह पीक विम्याचा लाभ द्या, कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफी द्यावी, संपूर्ण जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त घोषित करा, इच्छामरणाची परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Hingoliहिंगोलीelectricityवीज