शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन

By रमेश वाबळे | Updated: December 9, 2023 14:26 IST

हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील घटना; आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

हिंगोली : तालुक्यातील खंडाळा येथे एका २६ वर्षीय पदवीरधर तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विठ्ठल दत्तराव गायकवाड (वय २६, रा.खंडाळा ता.जि.हिंगोली) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे पदवीधर होवूनही नोकरी मिळत नाही, बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याची खंत विठ्ठल बोलून दाखवित असे, असे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.

खंडाळा येथील विठ्ठल दत्तराव गायकवाड याचे शिक्षण बी.एसस्सी झाले होते. परंतु, अनेकवेळा प्रयत्न करूनही नोकरी लागत नव्हती. तसेच हाताला कामही मिळत नाही. त्यामुळे विठ्ठल गायकवाड मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता. यातच त्याने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सकाळी ११ च्या समारास मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली