शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

९ नळयोजनांचे प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:40 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेतील ८७ गावांच्या मंजूर आराखड्यातील ९ कामांना आता तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. १ कोटी रुपयांपर्यंतची ही कामे असल्याने मुख्य अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्दे२९ गावांचे प्रस्ताव तांत्रिक समितीकडे

हिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेतील ८७ गावांच्या मंजूर आराखड्यातील ९ कामांना आता तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. १ कोटी रुपयांपर्यंतची ही कामे असल्याने मुख्य अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली आहे.जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा ८७ गावांचा आराखडा मंजूर झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने पुढील कारवाई ठप्प झाली होती. त्यामुळे अंदाजपत्रके तयार करणे, त्यांची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेणे ही कामे करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते. शिवाय मुख्यमंत्री पेयजलमधील गावांची कामेही निधीअभावी ठप्प असल्याचेच चित्र होते. तर काही कामांना तांत्रिक त्रुटींनी ग्रासले होते. शिवाय १ कोटीपेक्षा जास्त रक्कमेची कामे थेट मंत्रालयापर्यंत जात असल्याने तेथून मंजुरी मिळविणेही तेवढे सोपे नव्हते. तर ८७ गावांचा आराखडा मंजूर झाल्यावरही फारसी प्रक्रिया गतिमान न झाल्याने नव्याने रुजू झालेले के.आर. लिपने यांनी नंतर या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. १ कोटीपेक्षा कमी दराचे प्रस्ताव लागलीच तयार केले. अशा २९ गावांचे प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ९ गावांना पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळाली आहे.यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा, संघानाईक तांडा, वसमत तालुक्यातील धामणगाव, रिधोरा, कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा, रुद्रवाडी, सेनगाव तालुक्यातील माहेरखेडा, उटी ब्रह्मचारी, शेगाव या गावांचा समावेश आहे. उर्वरित गावांचे प्रस्तावही लवकरच मार्गी लागतील, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. तर प्रशासकीय मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारीच देणार आहेत. यंदा कामे करणे शक्य नसल्याने ८७ गावे पुन्हा २0२0-२१ च्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.तीन योजना : कार्यारंभ आदेश दिलेहिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथील योजना जि.प.उपाध्यक्ष असताना राजेश्वर पतंगे यांनी मंजुरीत आणली. मात्र मागील तीन वर्षांपासून रखडलेली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे यात मोठा व्यत्यय येत होता. चार ते पाच वेळा या कामाची निविदा निघाली. मात्र जाणीवपूर्वक कमी दराची निविदा भरण्याचा प्रकार अडसर ठरत होता. अखेर या योजनेची निविदा मंजूर झाली. तसेच कार्यारंभ आदेशही दिला. या योजनेसह येहळेगाव व सोमठाणा येथील योजनांचा कार्यारंभ आदेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे तीन योजना मार्गी लागल्या आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाईHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद