हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या काळातही जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या वाढतच असून ४ एप्रिल रोजी नवे ८८ रुग्ण आढळून आले. तसेच दोघांचा मृत्यूही झाला असून आतापर्यंतच्या मृताचा आकडा १०१ झाला आहे. जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन तपासणीत १५० पैकी ३७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात पळसोना १, ढोलउमरी ११, डिग्रस वाणी ४, पिंपळदरी ५, जिनमातानगर ३, नाईक नगर १, माळधामणी १, कारवाडी १, हनुमाननगर १, आदर्श कॉलनी १, सरस्वतीनगर १, हिंगोली १ असे एकूण ३१ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात गिरगाव येथे ३ रुग्ण आढळले, तर कळमनुरी येथे २ रुग्ण आढळले. तसेच औंढा परिसरात वाघी येथे १ रुग्ण आढळला. सेनगाव परिसरात १२ जणांची तपासणी केली असता यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये ५१ रुग्ण आढळले. यात जयपूर हिंगोली १, रिसाला बाजार ५, हनुमाननगर १, रामाकृष्णानगर ८, पिंपळखुटा २, गंगानगर २, औंढा ना. १, यशवंतनगर १, मारवाडी गल्ली १, एसआरपीएफ कॅम्प ३, कासारवाडा १, डेंटल कॉलेज १, महावीरनगर १, तरोडा नांदेड १, साईनगर १, आंबेडकरनगर २, जिजामातानगर १, गोर्लेगाव १, एनटीसी ५, अंतुलेनगर १, दत्तात्रयनगर १, टीव्ही सेंटर १, सावळा १, बळसोंड १, सीतारामनगर २, वसई १, मंगळवारा १ यांचा समावेश आहे. औंढा परिसरात औंढा १, लाख १, जवळा १ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात एकूण १४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील २९, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील ५८, कळमनुरी ३८, औंढा नागनाथ ११, सेनगाव येथील बरे झालेल्या ५ रुग्णांचा समावेश आहे.
मृताचा आकडा शंभरी पार
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी कोरानाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात बोल्डा फाटा येथील ८० वर्षीय पुरुषाचा व औंढा येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत १०१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच ७ हजार १४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ६ हजार २५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजघडीला ७८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर असलेल्या १५० रुग्णांना ऑक्सिजन, तर १० रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.