शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

महसूलने गाठले ६३ टक्के उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:34 AM

हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही गौण खनिज वसुलीत जिल्हा मागे आहे. जमीन महसुलाची ८७.४९ टक्के वसुली झाली. जमीन महसुलात हिंगोलीत १.८८ कोटींपैकी ५६.५५ लाख, सेनगावात ५७ लाखांपैकी १५.१५ लाख, वसमतला १.८४ कोटींपैकी ७८.३१ लाख, औंढा नागनाथला ५७ लाखांपैकी ३२.0५ लाख, कळमनुरीत ७५ लाखांपैकी ११.२४ लाखांची वसुली झाली आहे.गौण खनिजच्या महसुलाचे २१ कोटींचे उद्दिष्ट आहे. यात हिंगोलीत ५.३0 पैकी १.९२ कोटी, सेनगावात ३.५0 पैकी १.४५ कोटी, वसमतला ५.0५ पैकी ३.0७ कोटी, औंढा नागनाथमध्ये ३.६५ पैकी १.५८ कोटी, कळमनुरीत १.६६ पैकी ४७ लाखांची वसुली झाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन महसुलात ३७ लाख व गौण खनिजामध्ये २.३६ कोटींची वसुली केली आहे. आकड्यांच्या भाषेत सांगायचे तर सर्वाधिक ११.२५ कोटींचे उद्दिष्ट हिंगोली उपविभागाला आहे. तर वसुली ४.0९ कोटी आहे. हे प्रमाण ३६.४१ टक्के आहे. वसमत उपविभागाला ११.११ कोटींचे उद्दिष्ट व वसुली ५.७५ कोटींची आहे. हे प्रमाण ५१.८२ टक्के आहे. कळमनुरी उपविभागाला ४.२५ कोटींचे उद्दिष्ट व वसुली ४१.७५ कोटींची आहे. हिंगोली उपविभाग सर्वांत मागे दिसत आहे.यंदा राष्ट्रीय महामार्गांच्या कामामुळे मोठा महसूल मिळाला असला तरीही यातही मध्यंतरी अवैध गौण खनिज उत्खननाच्या तक्रारी होत्या. तर वाळू घाट लिलाव न झाल्याने या महसुलापासून सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्याला मोठा फटका सोसावा लागला आहे. तरीही गतवर्षी उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. यंदाही शासकीय कामांच्या भरवशावर शेवटच्या टप्प्यात महसूल विभाग उद्दिष्ट गाठेल, असे चित्र आहे. मात्र आगामी दीड महिन्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळूउपसा व गौण खनिज उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरूच आहे. यातील काही प्रकरणांत प्रशासनाने लक्ष घातले होते. मात्र या कारवायांना तेवढ्यापुरतेच स्वरुप मिळाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. वसमतमध्ये तर वाळूची खुलेआम वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. आता लिलावच नसल्याने हिंगोली, कळमनुरी, सेनगावातही हेच चित्र आहे. तलाठ्यावरील हल्ल्यापूर्वी आक्रमक असलेला औंढा तालुकाही आता थंड पडला आहे. विशेष म्हणजे काही कंत्राटदारांनी गौण खनिज उत्खनन करूनही प्रशासनास हुलकावणी दिल्याचे प्रकार घडल्याचे दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली