शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

महसूलने गाठले ६३ टक्के उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:34 IST

हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही गौण खनिज वसुलीत जिल्हा मागे आहे. जमीन महसुलाची ८७.४९ टक्के वसुली झाली. जमीन महसुलात हिंगोलीत १.८८ कोटींपैकी ५६.५५ लाख, सेनगावात ५७ लाखांपैकी १५.१५ लाख, वसमतला १.८४ कोटींपैकी ७८.३१ लाख, औंढा नागनाथला ५७ लाखांपैकी ३२.0५ लाख, कळमनुरीत ७५ लाखांपैकी ११.२४ लाखांची वसुली झाली आहे.गौण खनिजच्या महसुलाचे २१ कोटींचे उद्दिष्ट आहे. यात हिंगोलीत ५.३0 पैकी १.९२ कोटी, सेनगावात ३.५0 पैकी १.४५ कोटी, वसमतला ५.0५ पैकी ३.0७ कोटी, औंढा नागनाथमध्ये ३.६५ पैकी १.५८ कोटी, कळमनुरीत १.६६ पैकी ४७ लाखांची वसुली झाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन महसुलात ३७ लाख व गौण खनिजामध्ये २.३६ कोटींची वसुली केली आहे. आकड्यांच्या भाषेत सांगायचे तर सर्वाधिक ११.२५ कोटींचे उद्दिष्ट हिंगोली उपविभागाला आहे. तर वसुली ४.0९ कोटी आहे. हे प्रमाण ३६.४१ टक्के आहे. वसमत उपविभागाला ११.११ कोटींचे उद्दिष्ट व वसुली ५.७५ कोटींची आहे. हे प्रमाण ५१.८२ टक्के आहे. कळमनुरी उपविभागाला ४.२५ कोटींचे उद्दिष्ट व वसुली ४१.७५ कोटींची आहे. हिंगोली उपविभाग सर्वांत मागे दिसत आहे.यंदा राष्ट्रीय महामार्गांच्या कामामुळे मोठा महसूल मिळाला असला तरीही यातही मध्यंतरी अवैध गौण खनिज उत्खननाच्या तक्रारी होत्या. तर वाळू घाट लिलाव न झाल्याने या महसुलापासून सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्याला मोठा फटका सोसावा लागला आहे. तरीही गतवर्षी उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. यंदाही शासकीय कामांच्या भरवशावर शेवटच्या टप्प्यात महसूल विभाग उद्दिष्ट गाठेल, असे चित्र आहे. मात्र आगामी दीड महिन्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळूउपसा व गौण खनिज उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरूच आहे. यातील काही प्रकरणांत प्रशासनाने लक्ष घातले होते. मात्र या कारवायांना तेवढ्यापुरतेच स्वरुप मिळाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. वसमतमध्ये तर वाळूची खुलेआम वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. आता लिलावच नसल्याने हिंगोली, कळमनुरी, सेनगावातही हेच चित्र आहे. तलाठ्यावरील हल्ल्यापूर्वी आक्रमक असलेला औंढा तालुकाही आता थंड पडला आहे. विशेष म्हणजे काही कंत्राटदारांनी गौण खनिज उत्खनन करूनही प्रशासनास हुलकावणी दिल्याचे प्रकार घडल्याचे दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली