शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पीएफएमएस प्रणालीअभावी वित्त आयोगाचे ५४ कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्ह्यातील ५६३ पैकी केवळ ५ ग्रामपंचायतींमध्ये पीएफएमएस प्रणाली असून, इतर ग्रामपंचायतींचे १४ व्या वित्त आयाेगाचे अभिलेखेच अपलोड ...

हिंगोली : जिल्ह्यातील ५६३ पैकी केवळ ५ ग्रामपंचायतींमध्ये पीएफएमएस प्रणाली असून, इतर ग्रामपंचायतींचे १४ व्या वित्त आयाेगाचे अभिलेखेच अपलोड नाहीत. त्यामुळे १५ व्या वित्त आयाेगाचे ग्रामपंचायतींनी वितरित केलेले ५४ कोटी खात्यातच पडून आहेत.

हिंगोली जिल्हा परिषदेत पीएफएमएस प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींना सेवा पुरविणाऱ्या खाजगी कंपनीकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयाेगाच्या सर्व हप्त्यांचा खर्च ऑनलाइन केल्यानंतर १५ व्या वित्त आयोगात पीएफएमएस प्रणालीवर कारभार करणे शक्य आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींची रक्कम दरवर्षी शासनाकडून एका कंपनीस दिली जात असली तरीही संगणकासह इतर व्यवस्था ही कंपनी अद्ययावत ठेवत नाही. त्यामुळे ही कामे व्हायला तयार नाहीत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामपंचायतींना मागील तीन हप्ते खर्च करता आले नाहीत. त्यापूर्वी पीएफएमएसचे बंधन नव्हते. त्यामुळे खर्च तरी करता आला. आता पीएफएमस प्रणालीवर ग्रामपंचायत कधी येणार ? यावर कुणीच बोलायला तयार नाही. सध्या जिल्ह्यातील केवळ ५ ग्रामपंचायतींनी ही सर्व माहिती अद्ययावत भरल्याने त्यांचा कारभार पीएफएमएस प्रणालीवर आला आहे. त्यामुळे या पाच ग्रामपंचायतींना आपली विविध विकासकामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर ग्रामपंचायती मात्र ही प्रणाली कार्यान्वित झाल्याशिवाय निधी खर्च करू शकणार नाहीत. त्यामुळे किरकोळ काम करायचे असले, तरी ग्रामपंचायतींसमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे.

असे आहेत तीन हप्ते

जिल्हा परिषदेला २३ कोटी रुपयांचे अनटाइडचे दोन तर टाइडचे तीन हप्ते मिळाले. या एकूण ६९ काेटी रुपयांपैकी ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला जातो. म्हणजे या तीन हप्त्यांत ५४ कोटी रुपये ग्रामपंचायतींना गेले आहेत. यात अनटाइडमध्ये ग्रामपंचायतींना त्यांच्या गरजेनुसार खर्च करता येतो, तर टाइडमध्ये केवळ पाणीपुरवठा व स्वच्छतेवरच खर्च करता येतो.

सरपंचांची बोंब

मागील अनेक दिवसांपासून पीएफएमएस प्रणालीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कधी संगणकीय यंत्रणा सांभाळणाऱ्या यंत्रणेची साथ नसते, तर कधी प्रशासनच यात रस घेत नाही. त्यामुळे गावच्या विकासाचा गाडा आम्ही हाकायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. ही समस्या लवकर सुटणे गरजेचे आहे, असे नांदापूरचे उपसरपंच संदीपान बोरकर यांनी सांगितले.

शासन नवीन आदेश काढताना काही विचारच करीत नाही. आता १४ व्या वित्त आयोगापासूनचा हिशेब ऑनलाइन केल्याशिवाय नवीन खर्च करता येत नाही. दरवर्षी आमचा दीड लाखाचा निधी घेऊन खाजगी यंत्रणा यासाठी बसविली. उरलेला निधी गावाच्या विकासावर खर्च करायचा तर या अडचणी आहेत, असे सरपंच सुजाता गुडदे यांनी सांगितले.

असे आहे जिल्ह्यात चित्र

तालुका एकूण ग्रा.पं. पीएफएमस

हिंगोली १११ १

कळमनुरी १२५ ०

औंढा १०१ ०

सेनगाव १०७ २

वसमत ११९ २