शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वार्षिक योजनेत ५२ टक्केच खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:15 IST

जिल्हा वार्षिक योजनेत शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी केवळ ५२.१९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. आगामी काळात आचारसंहिता लागणार असल्याने तत्पूर्वी हा निधी खर्ची पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाला गती देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेत शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी केवळ ५२.१९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. आगामी काळात आचारसंहिता लागणार असल्याने तत्पूर्वी हा निधी खर्ची पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाला गती देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी वार्षिक योजनेतील सर्वसाधारण घटकात केवळ ५२ टक्केच निधी खर्च करण्याचे प्रमाण असल्याचे आढळले. यात कृषी विभागाच्या पीकसंवर्धानात ६.६६ पैकी २.८९ कोटी, मृदसंधारणात २.५0 पैकी १.0४ कोटी, पशुसंवर्धानात २.३५ पैकी १.३५ कोटी, वन विभागाचे ३.५0 पैकी २.३३ कोटीच खर्च झाले. सहकाराचा छदामही खर्च नाही. यात १६ पैकी ७.६५ कोटींचाच खर्च आहे. ग्रामविकासात ४.३७ पैकी २.८२ कोटींचाच खर्च झाला आहे. लघुपाटबंधारे स्थानिक स्तरने तर ४.५७ कोटींपैकी रुपयाही खर्च दाखवला नाही.पूरनियंत्रणावर ३0 पैकी २१ लाख खर्च पडले. सामाजिक सेवांमध्ये शिक्षणचा ३.२५ पैकी २.२४ कोटी, क्रीडाचा ७६ पैकी ४४ लाख, ग्रंथालय विभागाचा २६ पैकी ७ लाख, कामगार कल्याणचा ३0 पैकी २१ लाख, आरोग्य विभागाचा ३.९६ पैकी २.४0 कोटी खर्च झाला. पाणीपुरवठा विभागाने १३ कोटी रुपये घेतले असले तरीही खर्च मात्र तेवढा नाही. नगरविकासचा ६.२१ कोटींपैकी ६0 लाख तर मागासवर्गीयांच्या कल्याणावर १.0३ कोटींपैकी २ लाख खर्च झाले. या उर्जा विकासासाठी मंजूर २.७0 कोटींपैकी १.४0 कोटी खर्ची पडल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण व लघुउद्योगांसाठी ५७ लाखांपैकी ३९ लाख, रस्ते व पुलांवर १0 पैकी ३.५ कोटी, इमारतींवर ५.८0 पैकी ३.५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचे ३.८२ तर पर्यटन विकासाचे ३ कोटींपैकी छदामही खर्च नाही. इतर योजनांसाठी १.२१ कोटी रुपये असून ४७ लाख खर्च झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत १४.३५ पैकी १0 कोटी खर्च झाले. नवीन्यपूर्ण योजनेत ५ पैकी ३ कोटी खर्च झाले आहेत. हा खर्च दाखविला असला तरीही संबंधित विभागांना निधी वर्गच झालेला आहे. काही कामे सुरू तर काही सुरू होत आहेत.दरवर्षी जिल्ह्याचा निधी शंभर टक्के खर्च होतो. यंदाही ही परंपरा कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीने कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीfundsनिधी