शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

आरटीईत अजूनही ५0 टक्के जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:41 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.मागील काही वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशाची रक्कम न मिळाल्याने संस्थाचालकांत नाराजी होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीची रक्कम सोडून सर्व रक्कम अदा केली होती. त्यामुळे संस्थाचालक यंदा पुन्हा प्रवेश द्यायला राजी झाल्या. मात्र अजून त्यात फारशी प्रगती दिसत नाही. यावर्षी १२९९ पालकांनी आपल्या मुलाला आरटीईत प्रवेश मिळावा म्हणून आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ४९९ विद्यार्थ्यांची विविध शाळांमध्ये निवड झाली होती. मात्र आरटीईच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ २८0 जणांनाच संबंधित शाळांनी प्रवेश दिला आहे. काही विद्यार्थी प्रवेशास गेलेच नसल्याचे सांगितले जाते. तर काही ठिकाणी संस्थाचालकांनी त्यांना दिलेल्या १७ प्रकारच्या अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यावर शिक्षण विभागाही काही बोलत नाही. एकीकडे शाळा सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी उलटला असताना दुसरीकडे आरटीईत शंभर टक्के जागांवर विद्यार्थी निवडही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता नव्याने प्रवेश मिळाल्यास या विद्यार्थ्याचा तेवढा अभ्यास बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनुसार शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. कदाचित आधीच प्रवेश घेतला असल्यास त्यांच्या शुल्काचे काय?

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिक