शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आरटीईत अजूनही ५0 टक्के जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:41 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.मागील काही वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशाची रक्कम न मिळाल्याने संस्थाचालकांत नाराजी होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीची रक्कम सोडून सर्व रक्कम अदा केली होती. त्यामुळे संस्थाचालक यंदा पुन्हा प्रवेश द्यायला राजी झाल्या. मात्र अजून त्यात फारशी प्रगती दिसत नाही. यावर्षी १२९९ पालकांनी आपल्या मुलाला आरटीईत प्रवेश मिळावा म्हणून आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ४९९ विद्यार्थ्यांची विविध शाळांमध्ये निवड झाली होती. मात्र आरटीईच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ २८0 जणांनाच संबंधित शाळांनी प्रवेश दिला आहे. काही विद्यार्थी प्रवेशास गेलेच नसल्याचे सांगितले जाते. तर काही ठिकाणी संस्थाचालकांनी त्यांना दिलेल्या १७ प्रकारच्या अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यावर शिक्षण विभागाही काही बोलत नाही. एकीकडे शाळा सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी उलटला असताना दुसरीकडे आरटीईत शंभर टक्के जागांवर विद्यार्थी निवडही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता नव्याने प्रवेश मिळाल्यास या विद्यार्थ्याचा तेवढा अभ्यास बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनुसार शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. कदाचित आधीच प्रवेश घेतला असल्यास त्यांच्या शुल्काचे काय?

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिक