शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

आरटीईत अजूनही ५0 टक्के जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:41 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.मागील काही वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशाची रक्कम न मिळाल्याने संस्थाचालकांत नाराजी होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीची रक्कम सोडून सर्व रक्कम अदा केली होती. त्यामुळे संस्थाचालक यंदा पुन्हा प्रवेश द्यायला राजी झाल्या. मात्र अजून त्यात फारशी प्रगती दिसत नाही. यावर्षी १२९९ पालकांनी आपल्या मुलाला आरटीईत प्रवेश मिळावा म्हणून आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ४९९ विद्यार्थ्यांची विविध शाळांमध्ये निवड झाली होती. मात्र आरटीईच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ २८0 जणांनाच संबंधित शाळांनी प्रवेश दिला आहे. काही विद्यार्थी प्रवेशास गेलेच नसल्याचे सांगितले जाते. तर काही ठिकाणी संस्थाचालकांनी त्यांना दिलेल्या १७ प्रकारच्या अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यावर शिक्षण विभागाही काही बोलत नाही. एकीकडे शाळा सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी उलटला असताना दुसरीकडे आरटीईत शंभर टक्के जागांवर विद्यार्थी निवडही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता नव्याने प्रवेश मिळाल्यास या विद्यार्थ्याचा तेवढा अभ्यास बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनुसार शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. कदाचित आधीच प्रवेश घेतला असल्यास त्यांच्या शुल्काचे काय?

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिक