शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीने यंदाही अर्धवटच राहणार अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात १४ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन जि.प.कडून आखण्यात आले होते. शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती ग्राह्य धरून नियोजन ...

हिंगोली जिल्ह्यात १४ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन जि.प.कडून आखण्यात आले होते. शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती ग्राह्य धरून नियोजन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातही कार्यालयीन उपस्थिती १०० टक्के केली होती. मात्र शिक्षण संचालकांनी ५० टक्के शिक्षक उपस्थितीचा फाॅर्म्युला सांगितला आहे. त्यामुळे याचा अध्यापनावर परिणाम होणार आहे. शिक्षक शाळेत असतील तरच ते ऑनलाइन वर्ग तरी घेतील किंवा त्यासाठीचे नियोजन तरी करतील. मात्र शाळेत नसताना त्यांचे वर्ग सुरू राहतील की नाही, याचा काही नेम नाही. शासन आदेशाचा अंमल तर खात्रीने होणार आहे. त्यात गेल्यावर्षीही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण नाही झाला की परीक्षाही झाल्या नाहीत. यंदाही तीच परिस्थिती राहण्याची शंका सुरुवातीलाच व्यक्त होत आहे. पालक मात्र आपल्या मुलांचे नुकसान होत असल्याने हैराण आहेत. मुले यापुढे शाळा विसरूनच जातील की काय? अशी उपहासात्मक खंत अनेकजण व्यक्त करताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील शाळा

१३५०

जि.प. शाळा

८८२

अनुदानित शाळा

२०८

विनाअनुदानित शाळा

२३५

शिक्षक

७२५०

शिक्षकेतर कर्मचारी

२७२५

काय होतोय परिणाम

जि.प.च्या शाळांत शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती असल्याने शालेय नियोजनानुसार ऑनलाइन वर्ग घेण्यात अडचणी येत आहेत. त्यात आज जे शिक्षक आपले विषय घेत आहेत, ते थेट एक दिवसाआड अभ्यासक्रम घेत आहेत. वर्ग शिक्षकांना दिवसभर एक वर्ग सांभाळण्याची स्थिती नाही. ऑनलाइनमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. त्यातच एक दिवसाआड शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचा किती भाग पूर्ण होईल, हे सांगणे अवघडच आहे.

अध्यापन बंधनकारकच

शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा दिली म्हणजे घरून वर्ग घ्यायचे नाहीत असे नाही. त्यांनी घरूनच ऑनलाइन वर्ग भरवायचा आहे. त्यामुळे या ५० टक्के उपस्थितीमुळे अभ्यासक्रमावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यासही शिक्षण विभागाने सांगितली आहे. त्याचे पालन कितपत होईल, याची तपासणी करणारी यंत्रणा मात्र नाही.

मुलांना मोबाइल मिळत नसल्याने शिक्षकही चिंतेत

शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीच्या मुद्यापेक्षा १०० टक्के मुले किंवा पालकांकडे अँड्राॅईड मोबाइल नाही, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ऑनलाइन वर्ग घरूनही घेतले जात आहेत. मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे वेगळे नियोजन आवश्यक आहे.

रामदास कावरखे, शिक्षक

ग्रामीण मुलांना पालक मोबाइल देत नाहीत. काही ठिकाणी रेंज नाही. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनात मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीपेक्षा प्रत्यक्ष अध्यापनासह वर्ग भरणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी उपाय शोधला पाहिजे.

सुभाष जिरवणकर, शिक्षक