शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

४७३ कुपोषित बालकांना आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:09 IST

जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद देत नसल्याचे आढळून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद देत नसल्याचे आढळून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात महिला व बालविकास खात्याच्या सहा प्रकल्प कार्यालयांतर्गत १0७९ अंगणवाड्यांतील बालकांची वजन तपासणी केली होती. यात ४७३ बालकांचे वजन वय व उंचीच्या प्रमाणात आढळले नाही. या कुपोषित बालकांना यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ५0 लाखांचा निधी दिला असून यातून या बालकांना अतिरिक्त पोषण आहार, वैद्यकीय सेवा आदीसाठी प्रतिदिन २५ रुपये याप्रमाणे दोन महिन्यांचे दीड हजार रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. पूर्वी एकच महिना बालक बालविकास केंद्रात असायचा. तर त्याला केवळ १२५0 रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र यंदा दोन महिने ठेवले जाणार आहे. यामध्ये कळमनुरी प्रकल्पात १४ बालविकास केंद्रात २३ बालके, हिंगोलीत ३५ केंद्रांमध्ये ६१, वसमतला ८५ केंद्रांमध्ये १३४, सेनगावात ३४ केंद्रांमध्ये ९३, औंढा नागनाथला ६७ केंद्रांमध्ये १२९, आखाडा बाळापूर अंतर्गत १६ केेंद्रांमध्ये ३३ बालकांचा समावेश आहे. जवळच्या अंगणवाडीतील बालकांना एकत्रित करून एक बालविकास केंद्र स्थापन केलेले आहे.या बालकांना दिवसातून आठवेळा आहार मिळण्याची काळजी घेतली जात आहे. यात अंगणवाडी सेविका दोनदा अमायलेजयुक्त पीठाचा आहार देत आहेत. तर दोन वेळा घरचे जेवण घ्यायचे आहे. तर इतर चार वेळा अंडी व केळी आहारात द्यायची आहेत.कमी कुपोषित : १00२ बालकेकमी कुपोषित बालकांची संख्या जिल्ह्यात १00२ आहे. त्यांना अतिरिक्त आहार देऊन कुपोषणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मुले बालविकास केंद्रात दाखल करणे बंधनकारक नाही. केवळ त्यांना अंगणवाडी सेविकांच्या देखरेखीत आहार दिला जात आहे. यामध्ये प्रकल्पनिहायकळमनुरी-८५, हिंगोली-९६, वसमतगल११, सेनगाव-२८७, औंढा नागनाथ-१३७ तर आखाडा बाळापूर ८६ अशी कमी कुपोषित बालकांची संख्या आहे. वसमत या सधन तालुक्यातच कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसत असल्याने ही बाब चिंतेचा विषय आहे.बालविकास केंद्रात दाखल केलेल्या बालकांचे दर सात दिवसांनी वजन घेतले जात आहे. अंगणवाडी सेविकांनी आता आॅनलाईन गोषवारा पाठवून कुपोषित मुलांचा आढावा द्यायचा आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन