शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

४७३ कुपोषित बालकांना आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:09 IST

जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद देत नसल्याचे आढळून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद देत नसल्याचे आढळून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात महिला व बालविकास खात्याच्या सहा प्रकल्प कार्यालयांतर्गत १0७९ अंगणवाड्यांतील बालकांची वजन तपासणी केली होती. यात ४७३ बालकांचे वजन वय व उंचीच्या प्रमाणात आढळले नाही. या कुपोषित बालकांना यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ५0 लाखांचा निधी दिला असून यातून या बालकांना अतिरिक्त पोषण आहार, वैद्यकीय सेवा आदीसाठी प्रतिदिन २५ रुपये याप्रमाणे दोन महिन्यांचे दीड हजार रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. पूर्वी एकच महिना बालक बालविकास केंद्रात असायचा. तर त्याला केवळ १२५0 रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र यंदा दोन महिने ठेवले जाणार आहे. यामध्ये कळमनुरी प्रकल्पात १४ बालविकास केंद्रात २३ बालके, हिंगोलीत ३५ केंद्रांमध्ये ६१, वसमतला ८५ केंद्रांमध्ये १३४, सेनगावात ३४ केंद्रांमध्ये ९३, औंढा नागनाथला ६७ केंद्रांमध्ये १२९, आखाडा बाळापूर अंतर्गत १६ केेंद्रांमध्ये ३३ बालकांचा समावेश आहे. जवळच्या अंगणवाडीतील बालकांना एकत्रित करून एक बालविकास केंद्र स्थापन केलेले आहे.या बालकांना दिवसातून आठवेळा आहार मिळण्याची काळजी घेतली जात आहे. यात अंगणवाडी सेविका दोनदा अमायलेजयुक्त पीठाचा आहार देत आहेत. तर दोन वेळा घरचे जेवण घ्यायचे आहे. तर इतर चार वेळा अंडी व केळी आहारात द्यायची आहेत.कमी कुपोषित : १00२ बालकेकमी कुपोषित बालकांची संख्या जिल्ह्यात १00२ आहे. त्यांना अतिरिक्त आहार देऊन कुपोषणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मुले बालविकास केंद्रात दाखल करणे बंधनकारक नाही. केवळ त्यांना अंगणवाडी सेविकांच्या देखरेखीत आहार दिला जात आहे. यामध्ये प्रकल्पनिहायकळमनुरी-८५, हिंगोली-९६, वसमतगल११, सेनगाव-२८७, औंढा नागनाथ-१३७ तर आखाडा बाळापूर ८६ अशी कमी कुपोषित बालकांची संख्या आहे. वसमत या सधन तालुक्यातच कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसत असल्याने ही बाब चिंतेचा विषय आहे.बालविकास केंद्रात दाखल केलेल्या बालकांचे दर सात दिवसांनी वजन घेतले जात आहे. अंगणवाडी सेविकांनी आता आॅनलाईन गोषवारा पाठवून कुपोषित मुलांचा आढावा द्यायचा आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन