शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोत तब्बल ४७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:39 IST

मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या धाकापोटी मूकपणे सहन केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या धाकापोटी मूकपणे सहन केले जात आहे.मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या मे महिन्यात घटली होती. कडक उन्हामुळे परिणाम झाला की काय कोण जाणे? मात्र साप्ताहिक मजुरांची संख्या दहा ते पंधरा हजारांच्या घरात आली होती. आता जूनमध्ये पावसाळ्याचा महिना असतानाही मजुरांची संख्या वाढली आहे. यामध्ये यंत्रणांच्या ६६ कामांवर ६११0 मजूर आहेत. यात प्रामुख्याने वनविभागाच्या कामांचा समावेश आहे. यात हिंगोलीत १0 कामांवर ५७२, कळमनुरीत १८ कामांवर १३0२, सेनगावात १९ कामांवर १७३८, वसमतला १0 कामांवर १४३८ तर औंढ्यात ९ कामांवर १0६0 मजूर उपस्थिती आहे.उन्हाळ्यात बाहेर गावी कामे करून अनेक मजूर पावसाळ्याच्या तोंडावर गावातच शेतीकामे उपलब्ध होत असल्याने गावाकडे परततात. मात्र आता यांत्रिकीकरणामुळे गावातही मजुरांच्या हाताला फारशी कामे राहिली नाहीत. बैलजोडीवर पेरणी करणाºयांना मात्र मोठ्या प्रमाणात मजूर लावावे लागतात. परंतु शेतीत कामे कमी असल्याने मग्रारोहयोची मजूर उपस्थिती वाढावी, हेही कारण असू शकते. मात्र त्याची चाचपणी प्रशासनाकडून होते का? हा प्रश्न आहे.हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींना अचानकच मग्रारोहयोची कामे करण्याचा उल्हास आल्याचे पहायला मिळत आहे. यात हिंगोली तालुक्यात ४५ कामांवर ८६४२, कळमनुरीत ८0 कामांवर ४९५३, सेनगावात ९५ कामांवर १३७७६, वसमतला ३ कामांवर ४४ तर औंढा नागनाथ तालुक्यातील १९२ कामांवर १४ हजार १३८ मजूर असल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. कायम नकारघंटा वाजवणाºया पंचायत समित्यांचे पावसाळ्याच्या तोंडावर मनपरिवर्तन झाल्याचा सुखद धक्का अनेकांना बसला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना