शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

गारपीटग्रस्तांसाठी ४.७ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:13 IST

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.यंदा रबीच्या काढणीच्या हंगामातच गारपिटीने हल्लाबोल केल्याने शेतकºयांचे या पिकांसह फळबागा, भाजीपाला आदीचे नुकसान झाले आहे. यात ३३ ते ५0 टक्के नुकसान झालेले कळमनुरी, सेनगाव व वसमत तालुक्यात जिरायतीचे एकूण ५0१६ शेतकºयांचे क्षेत्र ३२९४ हेक्टरवर नुकसान असून २.२४ कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव आहे. यात ज्वारी १३२ हे., तूर ३.३, हरभरा-८0२.८ हेक्टर तर इतर २३५६ हेक्टर क्षेत्र आहे. फळपिके सोडून इतर बागायती पिकांसाठी हिंगोली, कळमनुरी, सेनगाव व वसमत तालुक्यातील ३३७३ शेतकºयांच्या १२६९ हेक्टरसाठी १.७१ कोटींचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात भाजीपाला १0३ हेक्टर, गहू ११४२ हेक्टर, कांदा ४.६ हेक्टर, केळी-२.६ तर करडई १७ हेक्टर आहे. कळमनुरी व हिंगोलीत ४६ शेतकºयांच्या २९ हेक्टर फळबागांसाठी ५.३२ लाखांचा प्रस्ताव आहे. यात पपई, डाळिंब, मोसंबी, आंबा, चिकू, संत्रा, लिंबोनीचा समावेश आहे.८0६ हेक्टरचे ५0 टक्क्यांवर नुकसानजिल्ह्यात ८0६ हेक्टरवर ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती पिकांमध्ये १0७७ शेतकºयांचा ६३७ हेक्टरचे ४३.३६ लाखांचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात ज्वारी-९२.२९ हेक्टर, हरभरा ५३७ हेक्टर व इतर ८.५ हेक्टरचा समावेश आहे. फळपिके सोडून बागायतीचे ५८६ शेतकºयांचे १५७ हेक्टरचे नुकसान झाले असून २१.२६ लाखांचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात कळमनुरी व वसमत तालुक्यात भाजीपाला ६.२ हेक्टर, गहू १४१ हेक्टर, केळी १.२ हेक्टर आहे. तर फळबागांचे कळमनुरी व वसमत तालुक्यातील २९ शेतकºयाचे ११.२ हेक्टरच्या नुकसानीस २ लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे.५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या १२५९ आहे. त्यात जिरायतीस ६८00, बागायतीस १३५00 तर फळपिकांस १८000 याप्रमाणे प्रस्ताव पाठविला. कळमनुरीत ४९.५५ तर वसमतला १७.१0 लाखांच्या भरपाईचा हा प्रस्ताव आहे.३३ ते ५0 टक्क्यांमध्ये ८१६६ शेतकºयांचे ४५९३ हेक्टर क्षेत्र असून त्याच निकषाप्रमाणे भरपाईचा हिंगोली १.३७ कोटी, कळमनुरी-२.३४ कोटी, सेनगाव २२.११ लाख, वसमतचा ५.९९ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.