शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

औंढा तालुक्यात ४५ गावांत टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:36 IST

तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔढा नागनाथ: तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.औढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गतवर्षी केवळ १५ ते २० गावांमध्येच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले होते. त्या पटीत यंदा १०१ पैकी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले होते. फेब्रुवारीतच तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईला सुरुवात झाली. परंतु तहसिलदार पांडुरंग माचेवाड व गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सुमारे ५४ गावांत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अधिग्रहण व टँकर सुरू केले आहेत. याचबरोबर त्यांनीइतर अडचणी जाणून घेतल्या आहेत. पंचायत समितीच्या वतीने अधिग्रहणासाठी तहसीलदारांकडे ७५ गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी देवळा तुर्क, प्रिंपी, कंजारा, देववाडी, देवाळा, लक्ष्मणनाईक तांडा, गांगलवाडी, उंडेगाव, सावळी तांडा, काशीतांडा, पांग्रा, लाख, दुधाळा, पूर, वडद, अंजनवाडा, मु. सावंगी, टाकळखोपा, काठोडा तांडा, सिध्देश्वर तांडा, रूपूर तांडा, हिवर खेडा, सेंदूरसना, रूपूर, लांडाळा, येळी अंजनवाडा तांडा, लाख, हिवरा, जाटू, भोसी, असोला तर्फे लाख, असोंदा, पिंपळा यासह ४५ गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहीर व बोअर अधिग्रहण करण्यात आले.पाऊस जरी पडला तरी पिण्याचा पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. हा प्रश्न तत्काळ सुटणे अवघड असल्याने या गावांमध्ये शासनाच्या धोरणानुसार ३० जूनपर्यंत अधिग्रहण आणि पाण्याचे टँकर राहणार आहे. अजूनही टंचाईग्रस्त गावांच्या भेटी देण्याचे काम सुरू असून गरज पडल्यास अधिग्रहण व टँकरसंख्यावाढवण्यात येणार असल्याचे बीडीओ ठोंबरे यांनी सांगितले. केळी, सावळी तांडा, धारखेडा, चिंचोली, निळोबा, देवसडी, जलालपूर, तपोवन, संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळा पाणी तांडा, सेवादास तांडा या पाच गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. ही सर्व अधिग्रहण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच मंजूर केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई