शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औंढा तालुक्यात ४५ गावांत टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:36 IST

तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔढा नागनाथ: तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.औढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गतवर्षी केवळ १५ ते २० गावांमध्येच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले होते. त्या पटीत यंदा १०१ पैकी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले होते. फेब्रुवारीतच तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईला सुरुवात झाली. परंतु तहसिलदार पांडुरंग माचेवाड व गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सुमारे ५४ गावांत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अधिग्रहण व टँकर सुरू केले आहेत. याचबरोबर त्यांनीइतर अडचणी जाणून घेतल्या आहेत. पंचायत समितीच्या वतीने अधिग्रहणासाठी तहसीलदारांकडे ७५ गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी देवळा तुर्क, प्रिंपी, कंजारा, देववाडी, देवाळा, लक्ष्मणनाईक तांडा, गांगलवाडी, उंडेगाव, सावळी तांडा, काशीतांडा, पांग्रा, लाख, दुधाळा, पूर, वडद, अंजनवाडा, मु. सावंगी, टाकळखोपा, काठोडा तांडा, सिध्देश्वर तांडा, रूपूर तांडा, हिवर खेडा, सेंदूरसना, रूपूर, लांडाळा, येळी अंजनवाडा तांडा, लाख, हिवरा, जाटू, भोसी, असोला तर्फे लाख, असोंदा, पिंपळा यासह ४५ गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहीर व बोअर अधिग्रहण करण्यात आले.पाऊस जरी पडला तरी पिण्याचा पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. हा प्रश्न तत्काळ सुटणे अवघड असल्याने या गावांमध्ये शासनाच्या धोरणानुसार ३० जूनपर्यंत अधिग्रहण आणि पाण्याचे टँकर राहणार आहे. अजूनही टंचाईग्रस्त गावांच्या भेटी देण्याचे काम सुरू असून गरज पडल्यास अधिग्रहण व टँकरसंख्यावाढवण्यात येणार असल्याचे बीडीओ ठोंबरे यांनी सांगितले. केळी, सावळी तांडा, धारखेडा, चिंचोली, निळोबा, देवसडी, जलालपूर, तपोवन, संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळा पाणी तांडा, सेवादास तांडा या पाच गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. ही सर्व अधिग्रहण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच मंजूर केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई