शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

औंढा तालुक्यात ४५ गावांत टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:36 IST

तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔढा नागनाथ: तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.औढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गतवर्षी केवळ १५ ते २० गावांमध्येच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले होते. त्या पटीत यंदा १०१ पैकी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले होते. फेब्रुवारीतच तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईला सुरुवात झाली. परंतु तहसिलदार पांडुरंग माचेवाड व गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सुमारे ५४ गावांत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अधिग्रहण व टँकर सुरू केले आहेत. याचबरोबर त्यांनीइतर अडचणी जाणून घेतल्या आहेत. पंचायत समितीच्या वतीने अधिग्रहणासाठी तहसीलदारांकडे ७५ गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी देवळा तुर्क, प्रिंपी, कंजारा, देववाडी, देवाळा, लक्ष्मणनाईक तांडा, गांगलवाडी, उंडेगाव, सावळी तांडा, काशीतांडा, पांग्रा, लाख, दुधाळा, पूर, वडद, अंजनवाडा, मु. सावंगी, टाकळखोपा, काठोडा तांडा, सिध्देश्वर तांडा, रूपूर तांडा, हिवर खेडा, सेंदूरसना, रूपूर, लांडाळा, येळी अंजनवाडा तांडा, लाख, हिवरा, जाटू, भोसी, असोला तर्फे लाख, असोंदा, पिंपळा यासह ४५ गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहीर व बोअर अधिग्रहण करण्यात आले.पाऊस जरी पडला तरी पिण्याचा पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. हा प्रश्न तत्काळ सुटणे अवघड असल्याने या गावांमध्ये शासनाच्या धोरणानुसार ३० जूनपर्यंत अधिग्रहण आणि पाण्याचे टँकर राहणार आहे. अजूनही टंचाईग्रस्त गावांच्या भेटी देण्याचे काम सुरू असून गरज पडल्यास अधिग्रहण व टँकरसंख्यावाढवण्यात येणार असल्याचे बीडीओ ठोंबरे यांनी सांगितले. केळी, सावळी तांडा, धारखेडा, चिंचोली, निळोबा, देवसडी, जलालपूर, तपोवन, संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळा पाणी तांडा, सेवादास तांडा या पाच गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. ही सर्व अधिग्रहण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच मंजूर केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई