शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

वार्षिक योजनेत ४२ कोटी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:11 IST

कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे.३0 टक्के कपातीमुळे सर्वाधिक घोर लागला होता तो जि.प.तील पदाधिकाºयांना. विविध योजनांचे नियोजन करताना अत्यल्प निधीमुळे अडचणी येत होत्या. मात्र वेळेत नियोजन न केल्यास पुन्हा सदस्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येत होती. तरीही जि.प.च्या एक-दोन योजनांना कात्री बसू नये, यासाठी इतरत्रचा निधी वळताही झाला होता. मात्र सर्वच योजनांसाठी ते शक्य नव्हते. त्यामुळे विविध समित्यांतील नियोजनाची थांबलेली प्रक्रिया उरकून घेतली अन् आता कपात मागे घेतल्याचा आदेश धडकला आहे. त्यामुळे काही विभागांना फेरनियोजन करावे लागणार आहे. ज्यांनी नियोजनच केले नाही, अशांना मात्र आता वाढीव निधीसह नियोजन करणे शक्य होणार आहे. यात समाजकल्याणच्या दलित वस्ती सुधार योजनेचे नियोजन अजून अंतिम टप्प्यात असल्याने या नव्या बदलाचा फायदा उचलणे शक्य आहे.अनेक विभागांनी तर ही कपात होणारच नाही, अशा पद्धतीने आधीच तयारी चालविली होती. अशांना याचा फायदा होणार असून त्यांना तत्काळ नियोजन करून हा निधी खर्च करणे शक्य होणार आहे. मात्र ज्यांनी तशी तयारी केली नव्हती, अशांना जोमाने कामाला लागणे अगत्याचे आहे.जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी ९५.६७ कोटींची तरतूद मंजूर होती. ती कपातीनंतर ७७.८0 कोटींवर आली होती. १७.८७ कोटी कमी झाले होते. ते परत आले. आदिवासी उपयोजनेत २९.१५ कोटींपैकी जवळपास ९ कोटी तर विशेष घटकमध्ये ५0.४७ पैकी १५ कोटी कपात होती.ही सर्व जवळपास ४२ कोटी रुपयांची रक्कम आता पुन्हा नियोजनात आली आहे. १ फेब्रुवारीचे वित्त विभागाचे परिपत्रक विविध विभागांमध्ये धडकला आहे. यात विविध प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.निधी कपात मागे घेतल्यानंतर आता पूर्वी रद्द झालेली कामे घेण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अधिकाºयांना विचारणा होत आहे. तर काही विभागांचे अतिरिक्त निधीकडे लक्ष लागले आहे.