शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

वार्षिक योजनेत ४२ कोटी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:11 IST

कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे.३0 टक्के कपातीमुळे सर्वाधिक घोर लागला होता तो जि.प.तील पदाधिकाºयांना. विविध योजनांचे नियोजन करताना अत्यल्प निधीमुळे अडचणी येत होत्या. मात्र वेळेत नियोजन न केल्यास पुन्हा सदस्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येत होती. तरीही जि.प.च्या एक-दोन योजनांना कात्री बसू नये, यासाठी इतरत्रचा निधी वळताही झाला होता. मात्र सर्वच योजनांसाठी ते शक्य नव्हते. त्यामुळे विविध समित्यांतील नियोजनाची थांबलेली प्रक्रिया उरकून घेतली अन् आता कपात मागे घेतल्याचा आदेश धडकला आहे. त्यामुळे काही विभागांना फेरनियोजन करावे लागणार आहे. ज्यांनी नियोजनच केले नाही, अशांना मात्र आता वाढीव निधीसह नियोजन करणे शक्य होणार आहे. यात समाजकल्याणच्या दलित वस्ती सुधार योजनेचे नियोजन अजून अंतिम टप्प्यात असल्याने या नव्या बदलाचा फायदा उचलणे शक्य आहे.अनेक विभागांनी तर ही कपात होणारच नाही, अशा पद्धतीने आधीच तयारी चालविली होती. अशांना याचा फायदा होणार असून त्यांना तत्काळ नियोजन करून हा निधी खर्च करणे शक्य होणार आहे. मात्र ज्यांनी तशी तयारी केली नव्हती, अशांना जोमाने कामाला लागणे अगत्याचे आहे.जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी ९५.६७ कोटींची तरतूद मंजूर होती. ती कपातीनंतर ७७.८0 कोटींवर आली होती. १७.८७ कोटी कमी झाले होते. ते परत आले. आदिवासी उपयोजनेत २९.१५ कोटींपैकी जवळपास ९ कोटी तर विशेष घटकमध्ये ५0.४७ पैकी १५ कोटी कपात होती.ही सर्व जवळपास ४२ कोटी रुपयांची रक्कम आता पुन्हा नियोजनात आली आहे. १ फेब्रुवारीचे वित्त विभागाचे परिपत्रक विविध विभागांमध्ये धडकला आहे. यात विविध प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.निधी कपात मागे घेतल्यानंतर आता पूर्वी रद्द झालेली कामे घेण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अधिकाºयांना विचारणा होत आहे. तर काही विभागांचे अतिरिक्त निधीकडे लक्ष लागले आहे.