शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
4
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
5
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
6
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
7
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
8
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
9
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
10
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
11
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
12
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
13
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
14
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
15
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
16
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
17
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
18
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
19
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
20
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांमध्ये ३५ सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली : गत दीड वर्षापासून सर्व जग कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे, तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे बाहेर आलेल्या सापांना कोणी ...

हिंगोली : गत दीड वर्षापासून सर्व जग कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे, तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे बाहेर आलेल्या सापांना कोणी मारू नये या चिंतेत सर्पमित्र आहेत. गत तीन महिन्यांमध्ये सर्पमित्रांनी ३५ सापांना पकडून जिल्ह्यातील पाणथळ व कोरड्या जागी नेऊन सोडले आहे.

उन्हाळा आणि पावसाळा या आठ महिन्यांमध्ये गर्मी तसेच उंदीर, बेडकांमुळे साप बाहेर येत असतात. सापांना माणसांंच्या हालचाली कळत असतात. स्वत:चा जीव वाचविण्याकरिता साप चावतो. विनाकारण साप कधीच चावत नाही, असा विश्वास सर्पमित्रांना आहे.

साप निघाल्याची माहिती दिल्यास आम्ही त्या ठिकाणी धावून जातो. २०२१ मध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये जवळपास ३५ साप पकडून जंगलात नेऊन सोडले आहेत. यामध्ये दिवड व धामण, कवड्या, गवत्या, डुरक्या, तस्कर, धुळधामीळ या ३२ बिनविषारी सापांचा समावेश होता. तर विषारी सापांमध्ये नाग, आग्यापरोड, मनियार यांचा समावेश आहे. तीन महिन्यात शहरातील जिजामातानगर, अकोला बायपास, आदर्श महाविद्यालय परिसर आदी भागातून सर्पमित्र मुरली कल्याणकर, ओम जाधव यांना बोलावणे आले होते. लगेच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन सापांना पकडून योग्य ठिकाणी जंगलात नेऊन सोडले.

सापांना मारू नये...

साप सहसा उंदीर, बेडूक तसेच गर्मीमुळे बाहेर येतात. पावसाळ्यात बेडूक आणि उन्हाळ्यात उंदीर जास्त प्रमाणात बाहेर येतात. त्यांना खाण्यासाठी साप बाहेर येतात. पण काही नागरिक साप दिसताच त्याला मारून टाकतात. असे न करता सर्पमित्रांना बोलावणे हिताचे ठरेल व सापांचा जीव वाचेल.

- मुरली कल्याणकर, सर्पमित्र, हिंगोली

फोटो नंबर १