शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

३,४८,०६९ बालकांना दिली जाणार जंतनाशक गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:32 IST

हिंगोली : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २१ सप्टेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन ...

हिंगोली : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २१ सप्टेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील ३ लाख ४८ हजार ६९ बालकांना जंतनाशकाची गोळी दिली जाणार आहे. तसेच २८ सप्टेंबर रोजी माँपअप दिन राबविण्यात येणार आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ टक्के बालकांत मातीमधून आतड्याचा कृमीदोष प्रसारित होतो. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. हा अजार होऊ नये यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील लाभार्थींना जंतनाशकाची गोळी देऊन त्यांचे आरोग्य निरोगी व सदृढ ठेवणे, लाभार्थांची पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत आहे. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार ६९ बालकांना जंतनाशकाची गोळी दिली जणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २,६१,०९६ तर शहरी भागातील ८६,९७३ असे एकूण ३,४८,०६९ लाभार्थांचा समावेश आहे. शाळेतील ६ ते १९ वर्षे वयोगटातील २४९६३२, शाळाबाह्य ७५७२, अंगणवाडीतील १ ते २ वर्षाचे २३,०११ तर २ ते ५ वर्षाचे ६७,८५४ बालक असे एकूण ९०,८६५ लाभार्थी असणार आहेत. या मोहिमेतून राहिलेल्या लाभार्थांना माँपअप दिनी २८ सप्टेंबर रोजी जंतनाशकगोळी दिली जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्था, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

अशी द्यावी गोळी

जंतनाशक गोळीचा डोस वयोगटानुसार देण्यात येणार आहे. यात १ ते २ वर्षे अर्धी गोळी (२०० मिलीग्रॅम) व २ ते ३ वर्ष वयोगटांतील लाभार्थींना पूर्ण एक गोळी (४०० मिलीग्रॅम) पाण्यात विरघळून देण्यात देण्यात येणार आहे. तसेच ३ ते १९ वयोगटातील लाभार्थांना एक गोळी (४०० मिलीग्रॅम) चघळून खाऊ घालावी. शाळाबाह्य मुलांना अंगणवाडी केंद्रात गोळ्या देण्यात येणार आहेत.

गोळी खाऊ घालण्यापूर्वी अशी घ्या काळजी

-आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे. रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.

-आजारी बालकांना गोळी देऊ नये.

- गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीमध्ये निरीक्षणासाठी थांबवून ठेवावे.

- गोळी खाल्ल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजीवनी पाजणे, त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे.

- ज्या मुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे, त्या मुलांना गोळी खाल्ल्यानंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही, अशी माहिती

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.