मंगळवारी जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत ५११ पैकी तब्बल १२० जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये हिंगोली परिसरात ११५ पैकी ३७, वसमत परिसरात १४९ पैकी ३१, कळमनुरी परिसरात १४१ पैकी ३५, औंढा परिसरात ७८ पैकी १३ तर सेनगाव परिसरात २८ पैकी ४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तपासणी केलेल्यांपैकी जवळपास २४ टक्के पॉझिटिव्ह आढळल्याने ही बाब चिंतेची बनली आहे. आरटीपीसीआर चाचणीतही बाधित आढळलेल्यांची संख्या मोठी आहे. यात हिंगोली परिसरात ६२, वसमत परिसरात २१, कळमनुरी परिसरात १३, सेनगाव परिसरात ५ तर औंढा परिसरात ५ जण बाधित आढळून आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत एकूण १०४ बाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी बरे झाल्याने घरी सोडलेल्यांमध्ये ९१ जणांचा समावेश आहे. त्यात सामान्य रुग्णालयातून ३३, लिंबाळा येथून ८, वसमत येथून १८, औंढा येथून ७ तर कळमनुरीतून २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यापैकी १२ जणांना संदर्भित केलेले होते.
कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत असून यावेळी रुग्णवाढीचा दरही मोठा आहे. त्यातच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याने आणखी काही दिवसांनी ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांचा आकडाच शतकाच्या पुढे जाण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी गंभीर होणे गरजेचे बनले आहे.
एक महिलेचा व एका पुरुषाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये हिंगोली येथील रिसाला बाजार येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व वसमत तालुक्यातील बोराळा येथील एका ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण मृत्यूचा आकडा ८४ वर पोहोचला आहे.
सक्रिय रुग्णसंख्या ७२१ वर
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा वाढत चालला आहे. तशी सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. सध्या ७२१ रुग्ण दाखल आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ६३९३ रुग्ण आढळून आले. यापैकी ५५८८ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर दाखल असलेल्या ७२१ पैकी ६० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय १० जण बायपॅपवर आहेत.