शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मग्रारोहयोत कुशलचे ३.0७ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:54 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या २१२ ग्रामपंचायतींमध्ये ८८१ कामे सुरू असल्याचे मग्रारोहयोतून सांगण्यात आले. यामध्ये औंढा तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींत २७९, वसमत तालुक्यात २४ ग्रा.पं.त ९४, हिंगोली तालुक्यात ४० ग्रा.पं.त १७२, कळमनुरी तालुक्यात ६१ ग्रा.पं.त २३३, सेनगाव तालुक्यात २८ ग्रा.पं.त १०३ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कामांवर औंढा-३८३८, वसमत-९८८, हिंगोली-२२२२, कळमनुरी-२५९६, सेनगाव-१२६६ अशी तालुकानिहाय मजूर उपस्थिती आहे. सुरू असलेल्या या कामांमध्ये बहुतांश कामे ही विहिरींची असल्याचे सांगण्यात येते. काही पंचायत समित्यांमध्ये नवीन कामे सुरू करण्यासाठी टाळाटाळ केली जात असली तरीही केवळ विहिरींच्या कामांमुळेच मजूरसंख्येत भर पडली आहे.या योजनेविषयी वाढत्या तक्रारींमुळे कामे होत नसून काही ठिकाणी तर नाहक तक्रारी करणाºयांचे टोळकेच निर्माण झाल्याचे दिसते. अशांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आल्यावर प्रशासनानेही त्यांचे मनोरंजन न केल्यास त्याला चाप बसू शकतो. शिवाय लोकप्रतिनिधींनीही नुसती कामे सुरू होण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिल्यास ही वेळच येणार नाही.मग्रारोहयोत झालेल्या कामांची कुशलची रक्कम मात्र मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब सुरू आहे. यात ३.०७ कोटी रुपये थकले आहेत. यात औंढा-६६.७ लाख, वसमत-१८.०६ लाख, हिंगोली-३८.९८ लाख, कळमनुरी-९६.२७ लाख, सेनगाव-८७.३९ लाख अशी तालुकानिहाय रक्कम आहे. तर १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व तालुक्यांची मिळून ५४ लाखांची मजुरी मिळणे बाकी असून ३६ लाख कळमनुरीचे आहेत.