शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काळ्या बाजारात जाणारा २७ टन रेशनचा तांदूळ पकडला

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: July 1, 2023 21:13 IST

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी : ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रमुनी बलखंडे

हिंगोली : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने काळ्या बाजारात २७ टन रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला. ही कारवाई हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात १ जून रोजी पहाटे १:४५ वाजता केली. यात पोलिसांनी २७ टन रेशनच्या तांदळासह ट्रक असा एकूण ३० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला एका ट्रकमधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलिस अंमलदार तुकाराम आम्ले, मोसिन पठाण, सुमित टाले, विनोद दळवी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे,आजम प्यारेवाले यांच्या पथकाने रिसाला बाजार येथे सापळा लावला. यावेळी अकोला बायपास भागाकडून नांदेड नाकाकडे एक ट्रक येत असल्याचे पथकाला दिसले. त्यांनी ट्रक थांबवून आतमध्ये पाहणी केलीअसता त्यात रेशनचा तांदूळ आढळून आला. चालकास या बाबत विचारणा केली असता अकोला बायपास भागातून ट्रकमध्ये माल भरला. हा माल कोठे घेऊन जायचा ते रौफभाई नावाचा व्यक्ती सांगणार होता, असे त्याने सांगितले. पोलिसांनी ५ लाख ४० हजार रूपये किमतीचा अंदाजे २७० क्विंटल असा २७ टन तांदूळ तसेच २५ लाख रूपये किमतीचा ट्रक असा एकूण ३० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.  याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या फिर्यादीवरून चालक सुर्यकांत नागनाथ आप्पा स्वामी (रा. तुळशीरामनगर तरोडा नाका नांदेड) व हिंगोलीतील रौफभाई नावाच्या व्यक्तीवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले तपास करीत आहेत. 

तपासानंतर मुख्य सुत्रधार येणार समोर

रेशन धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी शासन रेशन धान्य वितरण प्रणालीत दिवसेंदिवस सुधारणा करीत आहे. ऑनलाईन प्रणालीही राबविली जात आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली