शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्याचा मृत्यू, १७ मेंढ्या बचावल्या

By रमेश वाबळे | Updated: December 9, 2023 19:05 IST

मेंढपाळांचे दोन लाखांवर नुकसान झाले आहे

शिरडशहापूर (जि.हिंगोली) : चाऱ्यातून विषबाधा होऊन ४० पैकी २३ मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला शिवारात ९ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या मेंढ्या वसमत तालुक्यातील कोर्टा येथील मेंढपाळांच्या होत्या. त्यांचे दोन लाख रुपयांवर नुकसान झाले आहे.

वसमत तालुक्यातील कोर्टा येथील विष्णू भाऊराव आव्हाड २५ व नारायण सुभानराव आव्हाड यांच्या १५ मेंढ्या चारण्यासाठी औंढा तालुक्यातील शिरला शिवारात ८ डिसेंबरला आणल्या होत्या. या भागात दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर रात्री वाघीशिंगी शिवारात ते मुक्कामी थांबले होते. परंतु, विषबाधा झाल्यामुळे रात्री मेंढ्या तडफडत होत्या. हा प्रकार मेंढपाळांच्या लक्षात आला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने तातडीने उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे ४० पैकी २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर १७ मेंढ्या बचावल्या.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मधुसूदन रत्नपारखे, पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सखाराम खुणे, लातूरचे सहआयुक्त डाॅ. नानाअर्जुन सोनवणे, डाॅ. बोलपेलवार, डाॅ. खेडकर, डाॅ. खिल्लारे, डाॅ. पाटील, डाॅ. अंकुश राठोड, टाकळकर, डाॅ. पडोळे, डाॅ. धुळे, डाॅ. झनकवाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण पुढे येईल..शेतात सध्या रब्बीची कोवळी पिके असून, अवकाळी पावसामुळे काढणीच्या वेळी पडलेले सोयाबीनही उगवले आहे. हे कोवळे पीक खाल्ल्यामुळे मेंढ्यांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण पुढे येईल.- डाॅ. अंकुश राठोड, पशुधन वैद्यकीय अधिकारी, वाई गोरक्षनाथ

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली